शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

CoronaVirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढली?; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:28 IST

CoronaVirus कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद

मुंबई: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. रुग्णांची संख्या नेमकी कशामुळे वाढतेय, हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. परिस्थिती नक्की नियंत्रणात येईल. तुम्ही मला अशीच साथ देत राहा, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगानं वाढतेय. हे प्रमाण आपल्याला शून्यावर आणायचं आहे. मात्र रुग्णसंख्येच्या वाढीमागचं कारण समजून घ्यायला हवं, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण आता रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची वाट पाहत नाही. तर घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या करत आहोत. चाचण्यांची संख्या आपण मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाग्रस्तांना लवकर उपचार मिळावेत आणि त्यांच्या संपर्कात आल्यानं इतरांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी घरोघरी जाऊन चाचण्या करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.कोरोनाचा धोका मोठा आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा या आव्हानाचा मोठ्या हिमतीनं सामना करत आहे. मात्र आव्हानाची तीव्रता पाहता राज्यातील प्रशिक्षित नर्सेच, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी तसंच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांनी पुढे यावं. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली. कोरोनाविरोधात आपण लढाई लढत आहोत. या लढाईमध्ये अनेकांची साथ लागणार आहे. आपल्या राज्यात जे प्रशिक्षित नर्स, रुग्णालय कर्मचारी आहेत, त्यांच्यापैकी जे कुणी सेवेत नसतील. त्यांनी या लढाईत लढण्याची मानसिक इच्छा असेल तर पुढे यावं. तसेच लष्करातील निवृत्त जवान ज्यांना वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे त्यांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सेवेत यायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी Covidyoddha@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज पाठवावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे