शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Coronavirus: राज्यात संचारबंदी लागू, कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 09:09 IST

राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक काही काम नसताना देखील घराबाहेर निघत होते. त्यांनतर, सोमवारी ५ वाजता उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे. परंतु संचारबंदीच्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संचारबंदीच्या या काळात  नेमकं काय काय सुरु राहणार आणि काय काय बंद राहणार हे जाणून घ्या.

काय काय सुरु राहणार- 

जीवनावश्यक वस्तूंची दुकानंऔषधांची दुकानंदूध आणि दुग्धजन्य पदार्थदवाखाने, रुग्णालयंकिराणाची दुकानंरेल्वेतील मालवाहतूकबँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थावीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयंरिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)कृषीमालाशी सबंधित वाहतूक

काय काय बंद राहणार- 

मुंबईची लोकलसेवाजिल्ह्यांच्या सीमाराज्यातील सीमानागरिकांचा प्रवासशाळा, महाविद्यालयंमॉल, सिनेमागृह, नाट्यगृहधार्मिक प्रार्थना स्थळेखासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)परदेशातून येणारी वाहतूक

दरम्यान, याआधी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली होती. मात्र त्यात सोमवारी आणखी ८ जणांची भर पडली. या आठ जणांमध्ये सांगलीच्या ४, मुंबईच्या ३ आणि साताऱ्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे