शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 10:03 IST

संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांनी. घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोक घराबाहेर पडत असल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी पुढे येण्याची तयारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे. संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. संचारबंदी तसेच जिल्हाबंदीमुळे अपवाद वगळता एसटीसेवा बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्रात हा कर्मचारी लिहितो की, "कोरोना हा संसर्गजन्य रोग थांबविण्यासाठी मा. पंतप्रधानांनी एकवीस दिवसांचा लाॅक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात  संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्वात जास्त ताण हा महाराष्ट्रातील पोलिसांवर येणार आहे. रात्रंदिवस सतत कामावर राहावे लागणार आहे.  पोलिसांनी आपले कुटुंब सोडून कितीही तास बाहेर राहावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला सांभाळता सांभाळता स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याकरिता पोलिसांकडे मुळीच वेळ नाही. तसेच कामाचा प्रचंड प्रमाणात ताणतणाव सुद्धा सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील जनतेला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस बांधव प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा असलेल्या पोलीस यंत्रणा आणि  दवाखाने जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. 

महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवांपैकी एक एसटी महामंडळ सुद्धा आहे. सर्व जिल्ह्य़ातील सीमा बंद केल्याने आणि मा. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार ठराविक ठिकाण सोडता संपूर्ण एसटी महामंडळ बंदच आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी अर्थातच जनतेच्याच सेवेसाठी सदैव कार्य  तत्पर असलेले कर्मचारी म्हणजेच एसटीचे कर्मचारी. महाराष्ट्रावर आलेल्या संकटात एसटी कर्मचारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतच असतात. 

आज महाराष्ट्रवर तसेच देशावर माहामारीचे संकट उभे टाकले आहे. फक्त घरात बसून राहणे हाच एक रामबाण उपाय आहे. जनतेने घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता पडल्यास एसटी महामंडळाच्या चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राची तसेच देशाची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी कळकळीची विनंती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. परिवहन मंत्री साहेबांना करतो, असे या पत्रात म्हटले आहे.

"सर्वसामान्य जनतेला बाहेर येऊ न देणे. गरज पडल्यास आवश्यक वस्तू साठी बाहेर आलेच तर जमाव होऊ न देणे. हे काम आम्ही काटेकोरपणे करू. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जमावबंदी पथक अशा आशयाचे एक ओळखपत्र तयार करून देण्यात यावे.ग्रामीण भागात एसटी कर्मचारी  जास्त प्रमाणात वास्तव्यास आहेत. आणि तिथे पोलीस प्रशासन शहरीभागा सारखे  जास्त प्रमाणात ताकद लावू शकत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी एसटी कर्मचार्‍यांचा उपयोग चांगल्याप्रकारे होऊ शकतो. पुन्हा एकदा  राज्याची,देशाची सेवा करायची संधी आम्हाला द्यावी, अशी विनंती राज्य परिवहन मंडळाच्या या कर्मचाऱ्यांने परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटीPoliceपोलिस