शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडायचं नियोजन करता, तसं टाळेबंदीचंही करायला हवं होतं; शिवसेनेचा मोदी-शाहांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 13:48 IST

नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहेः शिवसेनेचा बाण

ठळक मुद्देराजीव बजाज यांनी मांडलेल्या मतांमुळे लॉकडाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे.अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे.

मुंबईः देशात लॉकडाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. राहुल गांधी यांनीही नेमकं तेच सांगितलं आणि आता राजीव बजाज यांनी मांडलेल्या मतांमुळे लॉकडाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे. अशाप्रसंगी निर्णय एकांगी घेऊन चालत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन पावलं टाकावी लागतात, असं टीकास्त्र शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर सोडलं आहे.

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत 'धक्का' द्यायचाच म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचं यासाठी जसं नियोजन केलं जातं तसं काटेकोर नियोजन टाळेबंदीबाबतही करणं गरजेचं होतं, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी – अमित शाह जोडीला लगावला आहे. 

पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले. या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे, अशी कडक टीका ख्यातनाम उद्योगपती राजीव बजाज यांनी केली आहे. त्याच आधारे, ‘बजाज यांचा बॅण्ड’ अशा मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं लॉकडाऊनचा पंचनामाच केला आहे.

>> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 'पुन:श्च हरिओम'चा नारा दिला. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत, पण 72 दिवसांच्या लॉकडाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे.

>> मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीने लॉकडाऊन लागू केले, असं परखड मत राजीव बजाज यांनी मांडलंय. त्यांनी काहीच नवं सांगितलं नाही. देशातील अनेक उद्योजक, व्यापारी व नोकरदार वर्गास नेमके हेच सांगायचे होते, पण अनामिक भीतीने त्यांनी गप्प राहणे पसंत केले.

>> बजाज यांनी लॉक डाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली. त्याबद्दल त्यांना 'ट्रोल' केले जाईल, देशविरोधी ठरवले जाईल, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील बजाज कुटुंबाचे योगदान व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेस ताकद देण्याची त्यांची धडपड देशाला माहीत आहे. त्यामुळे इतरांवर चालवले जाणारे 'हातखंडे' बजाज यांच्याबाबतीत चालणार नाहीत.

>> बजाज यांनी देशाच्याअर्थव्यवस्थेबाबत जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याची हिम्मत सरकारने दाखवायला हवी.

>> टाळेबंदी केली नसती तर विषाणू जास्त पसरला असता. रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढला असता हे खरे, पण नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतेही नियोजन नव्हते.

>> लोकांना थेट मदत करा असे राहुल गांधी, रघुराम राजन व आता राजीव बजाज यांनीही सांगितले आहे, पण नियोजन व दिशा नाही. हे नियोजन आता प. बंगाल व बिहार विधानसभेच्या निवडणुकांत दिसून येईल. अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे.

>> राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. सरकारचे उंबरठे झिजवून कंत्राटे मिळविणारे, बँकांची कर्जे बुडवून श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांपैकी ते नाहीत. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे.

>> देशाने राहुल गांधी यांचेही आभार मानलेच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत गांधी यांनी अनेकांना बोलते केले.

आणखी वाचाः

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा होती, पण धोका झाला'

केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधी