शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:41 IST

Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.२०२० च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाने २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतच कितीतरी अधिक बळी घेतले आहेत.विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ९०२० होती आणि १०२ मृत्यू झाले होते व मृत्युदर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत १९,९६९ रुग्ण  निघाले आणि ६०२ मृत्युंसह मृत्युदर ३.०१ वर पोहोचला. गोंदिया आणि चंद्रपूर या इतर दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांतही मृत्युदर वाढला असून अमरावती जिल्ह्यात मृत्यू दुपटीहून अधिक वाढले तरी बाधितांची संख्या अधिक असल्याने दर मात्र कमी दिसतो.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पहिल्या लाटेत ८७०३ रुग्ण होते. त्यापैकी २९५ जणांचा मृत्यू झाला व मृत्युदर २.२४ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत २८५८० रुग्ण असून मृत्यू ६१० झाले व मृत्युदर २.१३ टक्के आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाब‌ळी दुपटीहून अधिक वाढले आणि मृत्यूदरही जवळपास पहिल्या लाटेइतकाच आहे. आश्चर्य म्हणजे, मुंबईच्या पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू आणि मृत्यूदर दोन्ही कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

का वाढले मृत्यू?दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त. होम आयसोलेशनमधील रुग्णांची प्रकृती बिघडून ते अत्यवस्थ झाले.पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदी केली होती. दुसऱ्या लाटेत ती परिस्थिती दिसली नाही.ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा याबाबतच्या बातम्यांमुळे दहशत पसरली. त्या निगेटिव्ह भावनेने अनेकांना मृत्युने गाठले.लोक अंगावर दुखणे काढत होते. चाचणी उशिरा केल्याने उपचाराला खूप कमी वेळ मिळायचा. 

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वेगाने झाला. गंभीर रुग्ण वाढले. लक्षणे जाणवल्यानंतरही अनेकजण तपासणीला टाळाटाळ करतात. उशिराने रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.    -डॉ. विपीन ईटणकर,     जिल्हाधिकारी, नांदेड. 

गैरसमजामुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना टेस्ट करण्यासाठीही पुढे येत नव्हते. ग्रामीण भागासह जिल्हा मुख्यालयात सुसज्ज आरोग्य व्यवस्था असताना लोक रुग्णालयात भरती होण्यासाठी घाबरत होते. अनेक जण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याने ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही.    - दीपक सिंगला,     जिल्हाधिकारी, गडचिरोली

मराठवाडा : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३५१६ रुग्ण आढळले आणि ५३ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत १२०४३ रुग्ण सापडले आणि २९७ बळी गेले. पहिल्या लाटेत १.५० टक्के असलेला मृत्यूदर दुसऱ्या लाटेत एकदम २.४६ टक्क्यांवर गेला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाबळी दुपटीहून अधिक वाढले, मात्र बाधितांची संख्या अधिक असल्याने दर घसरलेला दिसतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार