शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:41 IST

Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.२०२० च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाने २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतच कितीतरी अधिक बळी घेतले आहेत.विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ९०२० होती आणि १०२ मृत्यू झाले होते व मृत्युदर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत १९,९६९ रुग्ण  निघाले आणि ६०२ मृत्युंसह मृत्युदर ३.०१ वर पोहोचला. गोंदिया आणि चंद्रपूर या इतर दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांतही मृत्युदर वाढला असून अमरावती जिल्ह्यात मृत्यू दुपटीहून अधिक वाढले तरी बाधितांची संख्या अधिक असल्याने दर मात्र कमी दिसतो.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पहिल्या लाटेत ८७०३ रुग्ण होते. त्यापैकी २९५ जणांचा मृत्यू झाला व मृत्युदर २.२४ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत २८५८० रुग्ण असून मृत्यू ६१० झाले व मृत्युदर २.१३ टक्के आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाब‌ळी दुपटीहून अधिक वाढले आणि मृत्यूदरही जवळपास पहिल्या लाटेइतकाच आहे. आश्चर्य म्हणजे, मुंबईच्या पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू आणि मृत्यूदर दोन्ही कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

का वाढले मृत्यू?दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त. होम आयसोलेशनमधील रुग्णांची प्रकृती बिघडून ते अत्यवस्थ झाले.पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदी केली होती. दुसऱ्या लाटेत ती परिस्थिती दिसली नाही.ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा याबाबतच्या बातम्यांमुळे दहशत पसरली. त्या निगेटिव्ह भावनेने अनेकांना मृत्युने गाठले.लोक अंगावर दुखणे काढत होते. चाचणी उशिरा केल्याने उपचाराला खूप कमी वेळ मिळायचा. 

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वेगाने झाला. गंभीर रुग्ण वाढले. लक्षणे जाणवल्यानंतरही अनेकजण तपासणीला टाळाटाळ करतात. उशिराने रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.    -डॉ. विपीन ईटणकर,     जिल्हाधिकारी, नांदेड. 

गैरसमजामुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना टेस्ट करण्यासाठीही पुढे येत नव्हते. ग्रामीण भागासह जिल्हा मुख्यालयात सुसज्ज आरोग्य व्यवस्था असताना लोक रुग्णालयात भरती होण्यासाठी घाबरत होते. अनेक जण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याने ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही.    - दीपक सिंगला,     जिल्हाधिकारी, गडचिरोली

मराठवाडा : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३५१६ रुग्ण आढळले आणि ५३ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत १२०४३ रुग्ण सापडले आणि २९७ बळी गेले. पहिल्या लाटेत १.५० टक्के असलेला मृत्यूदर दुसऱ्या लाटेत एकदम २.४६ टक्क्यांवर गेला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाबळी दुपटीहून अधिक वाढले, मात्र बाधितांची संख्या अधिक असल्याने दर घसरलेला दिसतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार