शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:41 IST

Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.२०२० च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाने २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतच कितीतरी अधिक बळी घेतले आहेत.विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ९०२० होती आणि १०२ मृत्यू झाले होते व मृत्युदर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत १९,९६९ रुग्ण  निघाले आणि ६०२ मृत्युंसह मृत्युदर ३.०१ वर पोहोचला. गोंदिया आणि चंद्रपूर या इतर दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांतही मृत्युदर वाढला असून अमरावती जिल्ह्यात मृत्यू दुपटीहून अधिक वाढले तरी बाधितांची संख्या अधिक असल्याने दर मात्र कमी दिसतो.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पहिल्या लाटेत ८७०३ रुग्ण होते. त्यापैकी २९५ जणांचा मृत्यू झाला व मृत्युदर २.२४ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत २८५८० रुग्ण असून मृत्यू ६१० झाले व मृत्युदर २.१३ टक्के आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाब‌ळी दुपटीहून अधिक वाढले आणि मृत्यूदरही जवळपास पहिल्या लाटेइतकाच आहे. आश्चर्य म्हणजे, मुंबईच्या पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू आणि मृत्यूदर दोन्ही कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

का वाढले मृत्यू?दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त. होम आयसोलेशनमधील रुग्णांची प्रकृती बिघडून ते अत्यवस्थ झाले.पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदी केली होती. दुसऱ्या लाटेत ती परिस्थिती दिसली नाही.ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा याबाबतच्या बातम्यांमुळे दहशत पसरली. त्या निगेटिव्ह भावनेने अनेकांना मृत्युने गाठले.लोक अंगावर दुखणे काढत होते. चाचणी उशिरा केल्याने उपचाराला खूप कमी वेळ मिळायचा. 

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वेगाने झाला. गंभीर रुग्ण वाढले. लक्षणे जाणवल्यानंतरही अनेकजण तपासणीला टाळाटाळ करतात. उशिराने रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.    -डॉ. विपीन ईटणकर,     जिल्हाधिकारी, नांदेड. 

गैरसमजामुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना टेस्ट करण्यासाठीही पुढे येत नव्हते. ग्रामीण भागासह जिल्हा मुख्यालयात सुसज्ज आरोग्य व्यवस्था असताना लोक रुग्णालयात भरती होण्यासाठी घाबरत होते. अनेक जण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याने ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही.    - दीपक सिंगला,     जिल्हाधिकारी, गडचिरोली

मराठवाडा : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३५१६ रुग्ण आढळले आणि ५३ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत १२०४३ रुग्ण सापडले आणि २९७ बळी गेले. पहिल्या लाटेत १.५० टक्के असलेला मृत्यूदर दुसऱ्या लाटेत एकदम २.४६ टक्क्यांवर गेला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाबळी दुपटीहून अधिक वाढले, मात्र बाधितांची संख्या अधिक असल्याने दर घसरलेला दिसतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार