शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

Coronavirus: राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:44 IST

ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले होते. अशातच राज्यभरात ऊसतोड कामगार लॉकडाऊन काळात घरापासून दूर अडकले होते. या कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग खुला आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा असा सल्ला त्यांनी कामगारांना दिला आहे.

राज्यातील साखर हंगाम सुरु झाल्याने जवळपास ३८ साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी कामगार कार्यरत होते. मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांसाठी साखर कारखान्याच्या स्तरावर निवारागृह सुरु करण्यात आले. या निवारागृहात कामगारांची संख्या १ लाख ३१ हजार ५०० इतकी आहे. मात्र दिर्घकाळ कामगार आपल्या कुटुंबीयांपासून दूर असल्यामुळे त्यांना स्वगृही परतण्यास विलंब होत आहे. त्यांच्यात असंतोष पसरत असल्याचं महाराष्ट्र राज्य  सहकारी साखर संघाने राज्य सरकारला कळवलं होतं.

यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या कामगारांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन त्यांच्याकडील निवासी पत्त्यासह गावनिहाय, तालुका/जिल्हानिहाय माहिती घेऊन मूळ गावी परत पाठवण्यासाठी Evacuation Plan तयार करावा. या यादीत संबंधित कामगारांच्या गावातील सरपंचाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांकही जोडावा. त्यानंतर ही यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवावी असं सांगण्यात आलं आहे.

तसेच सदर कामगारांच्या वाहतुकीबाबत आवश्यक परवाने घेण्याची कार्यवाही साखर कारखान्यांनी करावी. कामगार व त्यांचे कुटुंबीय गावी पोहचल्यानंतर कामगारांचा गावप्रवेश ही सरपंचाची जबाबदारी राहील. मूळ गावी पोहचल्यानंतर साखर कारखान्यांनी सरपंचांकडून ते प्रमाणपत्र घ्यावे आणि ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली यांच्याकडे सादर करावेत असं पत्रकात म्हटलं आहे.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस