शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:55 IST

शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे

ठाणे : आशिष शेलार तत्वज्ञानी आणि हुशार आहेत. त्यांनी जी टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली, त्यांचा राजीनामा मागितला, तेच गणित भाजपने नरेंद्र मोदींच्या बाबतीत वापरुन त्यांचाही राजीनामा घ्यावा, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते शेलार यांना बुधवारी लगावला.सोमवारी शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने काय केले, एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात काय केले, अशी टिका करण्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण रेट बघावे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी राज्याला एक दमडी दिली नाही आणि नको तो गवगवा केला जात आहे. परिस्थिती काय आहे, त्यात कशाप्रकारे बोलले पाहिजे, याचेही भान भाजप नेते हरवून बसले आहेत. यात माणसुकीचा धर्म बघायचा की यातही राजकारण करत बसायचे, असा सवाल त्यांनी केला.भाजपला सगळीकडे व्यवहार दिसतात, कारण ते धंदेवाईकच आहेत. म्हणूनच भाजपला शेठजींची पार्टी बोलले जाते. त्यांच्या डोक्यात नेहमीच व्यवहार असतात अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांचे आकडे लपविले जात असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप खोटा आहे. वास्तविक पाहता, पहिल्या दोन महिन्यात लॅब कमी होत्या. त्यामुळे रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला तर तो पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह, हे समजत नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना रुग्णसंख्या परत मोजायला लावली. फडणवीसांचे मंत्रालयात कोण खबरी आहेत, त्यांना कसे कागद पुरविले जातात, याची आम्हाला माहिती असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.चीनच्या हल्यात १९६७ नंतर २0२0 मध्ये जवानांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता देशाने लाल डोळे दाखविण्याची वेळ आली आहे. मोदींनी आक्रमकता दाखवावी. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असे आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.राजकारण करण्याची ही वेळ नाही - एकनाथ शिंदेसध्याच्या परिस्थितीत सर्वानी एकजूट होऊन काम करण्याची आहे. कोणीही राजकारण करु नये, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासनाबरोबर सर्व जण काम करत आहेत. कोणालाही बेडची कमतरता भासणार नाही. जास्तीत जास्त बेडची व्यवस्था तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे