शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:55 IST

शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे

ठाणे : आशिष शेलार तत्वज्ञानी आणि हुशार आहेत. त्यांनी जी टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली, त्यांचा राजीनामा मागितला, तेच गणित भाजपने नरेंद्र मोदींच्या बाबतीत वापरुन त्यांचाही राजीनामा घ्यावा, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते शेलार यांना बुधवारी लगावला.सोमवारी शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने काय केले, एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात काय केले, अशी टिका करण्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण रेट बघावे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी राज्याला एक दमडी दिली नाही आणि नको तो गवगवा केला जात आहे. परिस्थिती काय आहे, त्यात कशाप्रकारे बोलले पाहिजे, याचेही भान भाजप नेते हरवून बसले आहेत. यात माणसुकीचा धर्म बघायचा की यातही राजकारण करत बसायचे, असा सवाल त्यांनी केला.भाजपला सगळीकडे व्यवहार दिसतात, कारण ते धंदेवाईकच आहेत. म्हणूनच भाजपला शेठजींची पार्टी बोलले जाते. त्यांच्या डोक्यात नेहमीच व्यवहार असतात अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांचे आकडे लपविले जात असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप खोटा आहे. वास्तविक पाहता, पहिल्या दोन महिन्यात लॅब कमी होत्या. त्यामुळे रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला तर तो पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह, हे समजत नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना रुग्णसंख्या परत मोजायला लावली. फडणवीसांचे मंत्रालयात कोण खबरी आहेत, त्यांना कसे कागद पुरविले जातात, याची आम्हाला माहिती असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.चीनच्या हल्यात १९६७ नंतर २0२0 मध्ये जवानांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता देशाने लाल डोळे दाखविण्याची वेळ आली आहे. मोदींनी आक्रमकता दाखवावी. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असे आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.राजकारण करण्याची ही वेळ नाही - एकनाथ शिंदेसध्याच्या परिस्थितीत सर्वानी एकजूट होऊन काम करण्याची आहे. कोणीही राजकारण करु नये, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासनाबरोबर सर्व जण काम करत आहेत. कोणालाही बेडची कमतरता भासणार नाही. जास्तीत जास्त बेडची व्यवस्था तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे