शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

CoronaVirus News: मार्च ते सप्टेंबरदरम्यान रुग्ण निदानाचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:38 AM

CoronaVirus News: मृत्युदर घटला; कोरानाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : राज्यात मार्चात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून देशातील सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्युदरात महाराष्ट्र पुढे असल्याचे दिसून आले होते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या तुलनेत ४० टक्के संसर्ग राज्यात असल्याचे दिसून आले होते, आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, हे प्रमाण आता ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आले आहे.ऑगस्ट महिन्यात स्थिरावलेल्या कोरोनाच्या स्थितीने सप्टेंबरच्या पंधरवड्यात उसंडी मारली. या काळात अगदी १२ ते २२ हजारांवर दररोजच्या रुग्ण निदानाचा आलेख पोहोचला.याविषयी टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मागच्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे राज्यात दैनंदिन रुग्ण वाढ अधिक दिसून येते. परंतु एकूणच कोरोनाच्या मृत्युंमध्ये घट झाली असून, ही समाधानकारक स्थिती आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तर दुसºया बाजूला रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून, सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही २.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी सांगितले की, सध्या राज्यात कोरोना चाचण्यांची क्षमता दुप्पट करण्याचे काम सुरू आहे, तसेच मृत्युदर १ टक्क्यांच्या खाली आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही १० टक्के असल्याने, त्याविषयी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या निर्देशानुसार, विश्लेषण करण्यात येत आहे.कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढमुंबईत ३ फेब्रुवारी, २०२०ला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला, तर १ जूनला दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार करण्यात आला. त्यानंतर, २४ जून रोजी ३ लाख चाचण्या पार पडल्या. १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्या पूर्ण केल्या. २९ जुलैपर्यंत ५ लाख चाचण्या पार पडल्या होत्या, तर २३ आॅगस्टला चाचण्यांची संख्या ७ लाख झाली, तसेच २९ सप्टेंबरपर्यंत हीच संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस