शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Coronavirus News: आज तर आकाशात 'काळे' कावळेही दिसले नाहीत; संजय राऊतांकडून भाजपाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 18:26 IST

Coronavirus News BJP Maharashtra Bachao Protest : ''आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं''

ठळक मुद्दे 'माझं अंगण रणांगण' म्हणत राज्यभरातील भाजपाच्या नेत्यांनी आज आपापल्या घरासमोर निदर्शनं केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाच्या या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे.  भाजपाचं आंदोलन पूर्णतः फसलंय. त्यात जनता सहभागी झालीच नाहीः संजय राऊत

मुंबईः कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने 'महाराष्ट्र बचाओ'चा नारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून, 'माझं अंगण रणांगण' म्हणत राज्यभरातील भाजपाच्या नेत्यांनी आज आपापल्या घरासमोर निदर्शनं केली. काळ्या फिती लावून, काळे झेंडे उंचावून त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. अनेकांनी काळ्या रंगाचा मास्क लावून फलक दाखवले. या आंदोलनावरून, सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाच्या या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे.  

 

भाजपाचं आंदोलन पूर्णतः फसलंय. त्यात केवळ भाजपा  नेते होते. जनता त्यात सहभागी झालीच नाही. किंबहुना आज तर आकाशात कावळेही दिसले नाहीत. काळे. त्यांचं ते काळं आंदोलन आहे ना?. बहुतेक आज कावळे घरट्यांमध्ये बसलेत. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या, काळे बनियन घालून आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोरोना संकटात विरोधी पक्षच अपयशी ठरलाय आणि म्हणून ते स्वतःच स्वतःविरोधात आंदोलन करत आहेत. सरकार अपयशी ठरलंय असं या काळात सांगणं महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण एक युद्ध लढतोय. त्यात पुढे जात असताना अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही, असंही त्यांनी सुनावलं.

महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, अशा शब्दांत शिवसेनेनं मुखपत्रातून भाजपाला डिवचलं होतं. भाजपा नेते आशीष शेलार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर, आंदोलन अपयशी ठरल्यानं भाजप नेत्यांचा जळफळाट होत असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला.

दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते  आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचं भाजपाने दाखवून दिलंय, कोरोना को भूल गए, पॉलिटिक्स प्यारा है, असं त्यांनी ट्विटरवरून सुनावलंय. त्यामुळे पुढचे काही दिवस दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरूच राहण्याची चिन्हं आहेत. फक्त या वाक् युद्धात कोरोनाविरुद्धचं युद्ध मागे पडायला नको म्हणजे मिळवलं, एवढीच जनतेची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्याः    सत्तेची लालसाच नेत्यांना 'हे' करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण

ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला

भाजपा नेते ठाकरे सरकारच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस, खडसे, राणे दिसले आंदोलनात

थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

भाजपच्या नेत्यांना जडलाय निद्रानाश, जयंत पाटील यांचा आरोप

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस