शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus News : पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपवण्याचा निर्धार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 5:23 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : नवे उद्योगपर्व सुरू करण्याचा तसेच पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुंबई : महाराष्ट्रात नवीन उद्योग उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर जमिनी देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. कोणत्याही 'अटी'तटीचा सामना न करता परवानगीशिवाय हे उद्योग सुरू करता येतील असे त्यांनी जाहीर केले. नवे उद्योगपर्व सुरू करण्याचा तसेच पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी नवीन उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. नवीन उद्योग जर प्रदूषणमुक्त असतील तर त्यांच्यासाठी कुठल्याही अटी नसतील असे ते म्हणाले. सध्याच्या आर्थिक संकटात उद्योगांसाठी जमिनी खरेदी करण्याऐवजी त्या भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी देशाबाहेरील तसेच देशांतर्गत उद्योगांना दिला. राज्याचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आणखी काही निर्णय घेण्यात येतील असे संकेत त्यांनी दिले. नवीन शैक्षणिक सत्र राज्यात सुरळीत सुरू करायचे आहे. त्यादृष्टीने तुम्हा सर्वांच्या सहकायार्ने कोरोनाचे संकट संपवणार असे ते म्हणाले

परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात निघून गेला आहे. दुसरीकडे ग्रीन झोनमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू झालेले आहे ७० हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून प्रत्यक्ष ५० हजार उद्योग सुरू झाले आहेत. अशा उद्योगांना आज कामगारांची गरज आहे अशावेळी भूमिपुत्रांनी या उद्योगांमध्ये नोकऱ्या कराव्यात. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. संकटाला सामोरे जाताना मदार्सारखा लढणारा शिवरायांचा महाराष्ट्र स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की ग्रीन झोनमध्ये बहुतेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. आॅरेंजमध्येही त्या टप्प्याटप्प्याने करू. रेड झोनमध्ये तसे करणे शक्य होणार नाही. वेळोवेळी शिथिलतेबाबत पूर्वकल्पना दिली जाईल.अचानक निर्णय घेतला जाणार नाही. लॉकडाऊनचे कडक पालन करून आपण आतापर्यंत कोरोनाचा वेगाने होणारा गुणाकार रोखला आहे असे ते म्हणाले.' घरात राहा, सुरक्षित राहा,घराबाहेर राहताना सावध राहा असे आवाहनही त्यांनी केले.परप्रांतीय मजुरांनी पायी जाण्याची गरज नाही त्यांच्यासाठी रेल्वेगाड्यांची तसेच बसेसची व्यवस्था केली आहेकोकणवासियांना आवाहनमुंबईतून कोकण,प. महाराष्ट्रात गावी जाण्याची अनेकांची इच्छा आहे पण खरेच जाणे गरजेचे आहे का याचा विचार करा, आपल्यामुळे आपल्या गावी असलेल्या आप्तेष्टांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. गावी जाण्याची घाई न करणे हे आपल्या आप्तेष्टांवर व राज्यावर आपले उपकार असतील. रस्त्याने चालत जाण्याची काहीही गरज नाही. योग्यवेळी आपल्याला गावी पोहोचवण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तूर्त अधीर होऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात जे ग्रीन झोन आहेत ते तसेच राहावेत हे अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

मुंबईत व्यापक तयारीकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत व्यापक तयारी केली आहे.बीकेसीमध्ये आणखी हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाईल. गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, रेसकोर्स, वरळी डोम येथेही सुसज्ज कोविड सेंटर आहेत. पुढे किती रुग्ण वाढणार आहेत याचा अंदाज घेऊन सर्व व्यवस्था उभारली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस