शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:15 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंचा भाजपला टोला

मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्यपालांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. ज्यांच्या मनात काही काळंबेरं नाही, त्यांनी वाईट वाटून घ्यायचे काही कारण नाही. राज्य मोठ्या संकटात असताना काहींना फक्त राजकारण सूचत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.मंत्रिमंडळाने केलेली शिफारस राज्यपालांनी अद्याप स्वीकारलेली नाही, भाजप त्यावर राजकारण करत आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले, राज्य शासनाची शिफारस राज्यपालांना मान्य करावीच लागते. फार तर ते त्यात काही बदल किंवा सूचना करू शकतात. त्या जर त्यांनी केल्या तर त्यानुसार बदल करण्याचे काम राज्य शासन करेल. पण अद्याप त्यांनी यावर काही मत व्यक्त केलेले नाही, त्यांचा अभ्यास झाला की, ते मत कळवतील. मात्र काही तरी तांत्रिक कारणे देऊन भाजप राजकारण करू पहात आहे. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी न्यायालयात जात आहेत, यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज उरत नाही. हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाची साथ असताना भाजपने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी धडपड केली. आता महाराष्ट्र बिकट संकटातून जात असताना त्यांना राजकारण सूचत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलSanjay Rautसंजय राऊत