शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:15 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंचा भाजपला टोला

मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्यपालांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. ज्यांच्या मनात काही काळंबेरं नाही, त्यांनी वाईट वाटून घ्यायचे काही कारण नाही. राज्य मोठ्या संकटात असताना काहींना फक्त राजकारण सूचत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.मंत्रिमंडळाने केलेली शिफारस राज्यपालांनी अद्याप स्वीकारलेली नाही, भाजप त्यावर राजकारण करत आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले, राज्य शासनाची शिफारस राज्यपालांना मान्य करावीच लागते. फार तर ते त्यात काही बदल किंवा सूचना करू शकतात. त्या जर त्यांनी केल्या तर त्यानुसार बदल करण्याचे काम राज्य शासन करेल. पण अद्याप त्यांनी यावर काही मत व्यक्त केलेले नाही, त्यांचा अभ्यास झाला की, ते मत कळवतील. मात्र काही तरी तांत्रिक कारणे देऊन भाजप राजकारण करू पहात आहे. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी न्यायालयात जात आहेत, यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज उरत नाही. हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाची साथ असताना भाजपने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी धडपड केली. आता महाराष्ट्र बिकट संकटातून जात असताना त्यांना राजकारण सूचत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलSanjay Rautसंजय राऊत