शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

CoronaVirus News: राज्यातील दोन लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; पण 'त्या' आकड्यानं चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 9:42 PM

CoronaVirus News: राज्यातील एकूण रुग्णसंख्या साडे तीन लाखांच्या पुढे; दोन लाखांहून जास्त रुग्ण कोविडमुक्त

मुंबई: वैद्यकीय व्यवस्थापमुळे देशातील मृत्यू दरात घट होत आहे. देशात शनिवारी २.३५ टक्के हा मृत्यूदर नोंदवला आहे. देशातला मृत्यू दर हा जगातल्या सर्वात कमी मृत्यू दरापैकी एक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात शनिवारी ३.६५ टक्के मृत्यूदर आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात दिवसभरात ९ हजार २५१ कोरोना बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.

राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबई ५२, ठाणे ३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १२, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा २, पालघर २, वसई विरार मनपा ७, रायगड ३, पनवेल मनपा ३, नाशिक ४, नाशिक मनपा ८, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा ४, नंदूरबार १, पुणे १७, पुणे मनपा ४५, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ८, सोलापूर मनपा ४, सातारा १, कोल्हापूर ७, सांगली २, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी ५, औरंगाबाद मनपा ४, जालना ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, अकोला १, अमरावती १, बुलढाणा १, नागपूर मनपा १, वर्धा १, अन्य राज्य/देश १ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत शनिवारी १ हजार ८० रुग्ण व ५२ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. यामुळे आतापर्यंत १ लाख ८ हजार ६० कोरोना रुग्ण झाले असून ६ हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार ८७६ इतकी असून सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ८५४ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी १९.९४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ८ लाक ९४ हजार व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४४ हजार ६०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस