शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: घराकडे गेलेले परप्रांतीय म्हणतात महाराष्ट्रच बरा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 10:06 IST

राज्यातील परप्रांतीयांना दिला आहे तिथे थांबण्याचा सल्ला 

ठळक मुद्देसांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये सकारात्मक परिणामपरराज्यात परतणाऱ्या परप्रांतीयांनी बनवला व्हिडीओ पिण्यास पाणीही देत नसल्याचा केला आरोप

अविनाश कोळीसांगली : हातातील रोजगार सोडून भावनिक होत उत्तर प्रदेशात त्यांच्या गावी परतलेल्या तरुणांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दलचा एक व्हिडिओ सांगलीतील उत्तर भारतीयांच्या मोबाईलवर पाठविला. महाराष्ट्रातील उपाययोजना, याठिकाणी मिळत असलेले लोकांचे प्रेम, आधार उत्तर प्रदेशात शोधूनही सापडत नसल्याची भावना त्यांनी यात मांडली आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाल्याने कामगारांचे उत्तर प्रदेशला जाण्याचे प्रमाण घटले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसात तीन हजारावर कामगार उत्तर प्रदेशात रवाना झाले. विशेष रेल्वेने त्यांना पाठविण्यात आले. या दोन्ही जिल्ह्यात त्यांचे रोजगाराचे बस्तान बसले असतानाही कोरोनाच्या भीतीने तसेच कुटुंबाच्या आठवणीने भावनिक होत त्यांनी हे दोन्ही जिल्हे सोडण्याचा निर्णय घेतला. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे लोंढे त्यांच्या गावाकडे परतत आहेत. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सिरक्षित रवानगी करताना महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी, जिल्हा प्रशासनाने त्यांची सर्व प्रकारची सोय केली.

जाताना परप्रांतीयांसाठी महाराष्ट्रातून पुरेसे जेवण, पाणी, चहा, नाष्टा आणि प्रवासात आवश्यक असलेले साहित्य, वैद्यकीय उपचार अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. महाराष्ट्राची सीमा ओलांडून उत्तर प्रदेशात गेलेल्या या परप्रांतीय कामगारांना त्याठिकाणचे चित्र अस्वस्थ करून गेले. रेल्वेतून उतरल्यानंतर गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, गाजीपूर, जौनपूर अशा अनेक जिल्ह्यासाठी मिळेल त्या वाहनाने हे कामगार गावाच्या दिशेने जाऊ लागले. अनेक रस्त्यांवर गर्दी, गोंधळ त्यांना दिसून आला. प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना त्यांना दिसत नव्हत्या. पाणी आणि जेवणाविना या कामगारांचे हाल होत आहेत.

एका ट्रकवर उभे राहून काही तरुणांनी त्याठिकाणच्या परिस्थितीचा एक व्हिडिओ तयार करून महाराष्ट्रात पाठविला. त्यात एक तरुण म्हणतो, महाराष्ट्रातून जेवण, पाणी, नाष्टा व सर्व सुविधांचा आनंद घेऊन आम्ही उत्तर प्रदेशात आलो आणि आता अन्न-पाण्याविना आमचे हाल होत आहेत. महाराष्ट्राने जे दिले ते कधीही विसरू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टी आमच्यासाठी केल्या त्या कुणीही केल्या नाहीत. त्यामुळे जे महाराष्ट्रात थांबले आहेत, ते नशिबवान आहेत. महाराष्ट्रच संकटात चांगली मदत परप्रांतीयांना करीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतीय कामगारांसह येथील उद्योजकांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओचा सकारात्मक परिणामया व्हिडिओमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये सकारात्मक परिणाम होत आहे. राज्याकडे व गावाकडे परतण्याचा बेत ते आता रद्द करीत आहेत. त्यामुळे येथील उद्योग व व्यवसायिकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परतीच्या प्रवासाकरीता रेल्वे व बसची नोंद करूनही ऐनवेळी जाण्याचा निर्णय बदलणाऱ्या कामगारांची संख्या वाढत आहे. बुधवारी अशा जवळपास ५0 हून अधिक कामगारांनी येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस