शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

Coronavirus: घराकडे गेलेले परप्रांतीय म्हणतात महाराष्ट्रच बरा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 10:06 IST

राज्यातील परप्रांतीयांना दिला आहे तिथे थांबण्याचा सल्ला 

ठळक मुद्देसांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये सकारात्मक परिणामपरराज्यात परतणाऱ्या परप्रांतीयांनी बनवला व्हिडीओ पिण्यास पाणीही देत नसल्याचा केला आरोप

अविनाश कोळीसांगली : हातातील रोजगार सोडून भावनिक होत उत्तर प्रदेशात त्यांच्या गावी परतलेल्या तरुणांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दलचा एक व्हिडिओ सांगलीतील उत्तर भारतीयांच्या मोबाईलवर पाठविला. महाराष्ट्रातील उपाययोजना, याठिकाणी मिळत असलेले लोकांचे प्रेम, आधार उत्तर प्रदेशात शोधूनही सापडत नसल्याची भावना त्यांनी यात मांडली आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाल्याने कामगारांचे उत्तर प्रदेशला जाण्याचे प्रमाण घटले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसात तीन हजारावर कामगार उत्तर प्रदेशात रवाना झाले. विशेष रेल्वेने त्यांना पाठविण्यात आले. या दोन्ही जिल्ह्यात त्यांचे रोजगाराचे बस्तान बसले असतानाही कोरोनाच्या भीतीने तसेच कुटुंबाच्या आठवणीने भावनिक होत त्यांनी हे दोन्ही जिल्हे सोडण्याचा निर्णय घेतला. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे लोंढे त्यांच्या गावाकडे परतत आहेत. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सिरक्षित रवानगी करताना महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी, जिल्हा प्रशासनाने त्यांची सर्व प्रकारची सोय केली.

जाताना परप्रांतीयांसाठी महाराष्ट्रातून पुरेसे जेवण, पाणी, चहा, नाष्टा आणि प्रवासात आवश्यक असलेले साहित्य, वैद्यकीय उपचार अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. महाराष्ट्राची सीमा ओलांडून उत्तर प्रदेशात गेलेल्या या परप्रांतीय कामगारांना त्याठिकाणचे चित्र अस्वस्थ करून गेले. रेल्वेतून उतरल्यानंतर गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, गाजीपूर, जौनपूर अशा अनेक जिल्ह्यासाठी मिळेल त्या वाहनाने हे कामगार गावाच्या दिशेने जाऊ लागले. अनेक रस्त्यांवर गर्दी, गोंधळ त्यांना दिसून आला. प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना त्यांना दिसत नव्हत्या. पाणी आणि जेवणाविना या कामगारांचे हाल होत आहेत.

एका ट्रकवर उभे राहून काही तरुणांनी त्याठिकाणच्या परिस्थितीचा एक व्हिडिओ तयार करून महाराष्ट्रात पाठविला. त्यात एक तरुण म्हणतो, महाराष्ट्रातून जेवण, पाणी, नाष्टा व सर्व सुविधांचा आनंद घेऊन आम्ही उत्तर प्रदेशात आलो आणि आता अन्न-पाण्याविना आमचे हाल होत आहेत. महाराष्ट्राने जे दिले ते कधीही विसरू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टी आमच्यासाठी केल्या त्या कुणीही केल्या नाहीत. त्यामुळे जे महाराष्ट्रात थांबले आहेत, ते नशिबवान आहेत. महाराष्ट्रच संकटात चांगली मदत परप्रांतीयांना करीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतीय कामगारांसह येथील उद्योजकांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओचा सकारात्मक परिणामया व्हिडिओमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये सकारात्मक परिणाम होत आहे. राज्याकडे व गावाकडे परतण्याचा बेत ते आता रद्द करीत आहेत. त्यामुळे येथील उद्योग व व्यवसायिकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परतीच्या प्रवासाकरीता रेल्वे व बसची नोंद करूनही ऐनवेळी जाण्याचा निर्णय बदलणाऱ्या कामगारांची संख्या वाढत आहे. बुधवारी अशा जवळपास ५0 हून अधिक कामगारांनी येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस