शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

CoronaVirus News: ट्विटरवर #UddhavMustAnswer ट्रेंडिंग; कोरोनावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 9:14 AM

CoronaVirus Marathi News: मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेता धावला; केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजारांच्या पुढे गेली असून त्यात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ११ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे. ट्विटरवर #UddhavMustAnswer हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून अनेकजण या हॅशटॅगचा वापर करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत.सायन रुग्णालयातल्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर भाष्य करताना यावरुन राजकारण करण्याची गरज नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या शरीरातून विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी तो काळ्या रंगाच्या मोठ्या पिशवीमध्ये ठेवला जातो, असं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं. यानंतर भाजपा महाराष्ट्रनं एक ट्विट केलं. आरोग्यमंत्र्यांच्या असंवेदनशील प्रतिक्रियेशी सहमत आहात का, असा प्रश्न भाजपानं ट्विटमधून विचारला. या ट्विटमध्ये #UddhavMustAnswer वापरण्यात आला. 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल या बैठकीत चर्चा झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री स्वत: मंत्रालयात येत नसतील, तर ते इतरांना कशाला बोलावतात, असा प्रश्न विचारला जात आहे. इतर नेतेही उद्धव यांच्याप्रमाणेच स्वत:च्या घरातून बैठकीला उपस्थित राहू शकले असते, असं अनेकांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, विशेषत: मुंबईत झपाट्यानं वाढणारे रुग्ण, पीपीई किट्स, मास्कची कमतरता यावरुन अनेकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी काही जणांनी केली आहे.

ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सुरू असलेल्या टीकेला काँग्रेस नेते चरणसिंग सप्रांनी उत्तर दिलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती सप्रा यांनी आकडेवारीसह दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं उचलेली पावलं, घेतलेले महत्त्वाचे निर्णय यांचा तपशील सप्रा यांनी दिला आहे.

 

कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार जीएसटीमधील महाराष्ट्राचा वाटा अजूनही देत नाही. राज्याचे १५ हजार कोटी मोदी सरकारनं थकवले आहेत. २५ हजार कोटींच्या पॅकेजची गरज असताना केवळ १६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असं सप्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस