शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

CoronaVirus In Maharashtra: गर्दी वाढल्यास दारूची दुकाने बंद करू; राजेश टोपे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 09:41 IST

ऑक्सिजनची मागणी वाढल्यास निर्बंध आणखी कडक होणार

जालना : दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांमध्ये गर्दी झाली तर त्यावर बंदी आणली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर यापेक्षाही अधिक कडक निर्बंध लागू करावे लागतील, असे टोपे यांनी येथे स्पष्ट केले.   

राज्यभरात रविवारी रात्रीपासून संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल चालक, रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी सर्व समाजाचे हित पाहून निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन टोपे यांनी केले.  

मंदिरांसह इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सध्या लागू असलेले निर्बंध सर्वांनी पाळले तर कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. परंतु दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमध्ये सूचनांचे उल्लंघन करीत गर्दी होत असेल तर तीही बंद करावी लागतील, असेही टोपे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे