शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: जून-जुलै महिने चिंताजनक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:52 IST

देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले

मुंबई : आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला; मात्र मे अखेर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून जून, जुलैमध्ये हा संसर्ग उच्चांकीपातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तसा इशारा दिला आहे. चीनच्या वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशभरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र मजूर विविध झोन्समधून प्रवास करीत असल्याने प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादर्भाव 

वाढू शकतो. लॉकडाऊनमुळे राज्याला सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राने जीएसटीच्या परताव्याची रक्कम आणि केंद्रीय करातील राज्याचा वाटा तातडीने द्यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात. सुमारे १० लाख शेतकºयांना त्याचा फायदा होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे. काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत, त्यांना सीमा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना विशेष पास देऊन या सेवेचा उपयोग करता येईल, अशी मागणीही ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.

पोलिसांना विश्रांती हवी; केंद्रीय मनुष्यबळाची गरजकोरोना महामारीच्या या संकटकाळात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत.विशेषत: पोलिसांना विश्रांती देण्याची गरज आहे. ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल, तसे केंद्र सरकारने त्यांच्याकडील मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी