शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रिक्षा-टॅक्सी चालकांना महिन्याला ५ हजार द्या; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 14:08 IST

कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देजागतिक बँकेची २०१५ ची आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेची व्याख्या ही प्रतिदीन १४४ रुपये इतकी आहेरिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिना किमान ५ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना कामबंद करावं लागलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही खासगी वाहतुकीला सरकारकडून परवानगी नाही त्यामुळे अनेकांच्या पोटावर पाय आला आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून या कामगारांना बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी केली आहे.

या पत्रात पृथ्वीराज चव्हाणांनी लिहिलं आहे की, कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या १० लाख ६० हजार परवानाधारक रिक्षाचालकांवर आणि २ लाख ७५ हजार परवानाधारक टॅक्सी चालकांवरसुद्धा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली राज्य सरकारने या घटकांना दर महिन्याला ५ हजार देण्याचे जाहीर केलं आहे. आपल्या सरकारनेदेखील बांधकाम मजुरांना महिना २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले.

त्यामुळे जागतिक बँकेची २०१५ ची आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेची व्याख्या ही प्रतिदीन १४४ रुपये इतकी आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारकडून असंघटित आणि हातावर पोट भरणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिना किमान ५ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

याबाबत रिक्षा चालकांनी म्हटलं आहे की, दररोज शहरामध्ये जेमतेम ३०० ते ४०० रुपये कमाई होते. त्यामध्ये इंधनवाढ, शासनाचे विविध कर, इन्सुरन्स, बँक लोन, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारपण आणि वाढती महागाई याचा फटकाही आम्हाला बसतो. या अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते. शहराच्या बाबतीत रिक्षा चालक-मालक हा नेहमीच सामाजिक भान ठेवून वागत आहे. वेळेप्रसंगी प्रसंगावधान राखून अनेक वेळा समस्येत, अपघातात निस्वार्थी मदत केली आहे. अशा संघर्षकाळात आमची रोजची कमाई बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांच्या समस्येसाठी कोणतेही कल्याणकारी मंडळ नाही. या लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षा चालक मालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि कुटुंब उदरनिर्वाहाचा मोठा बिकट प्रश्न झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी कराड तालुका चालक मालक रिक्षा कृती समितीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती.  

अन्य बातम्या

राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!

माणुसकी हाच खरा धर्म! हज यात्रेसाठी जमा केलेल्या पैशातून ‘त्याने’ मजुरांना अन्नधान्य वाटले

...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणauto rickshawऑटो रिक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस