शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:32 IST

कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल.

- विशेष प्रतिनिधी मुंबई : कारखान्यांनी आपल्या कामगारांना एक आठवड्यात ६० तासांपेक्षा अधिक काम देऊ नये, असा आदेश राज्याच्या कामगार विभागाने काढला आहे. त्यात कामगारांसंदर्भात काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढलेल्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांच्या ओव्हरटाइमचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने दिले पाहिजे.कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल. कोणत्याही दिवशी कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. कामाचे तास हे विश्रांतीच्या वेळेसह १३ तासांपेक्षा अधिक असू नयेत. कोणत्याही आठवड्यात एकूण कामाचे तास साआठ तासांपेक्षा अधिक असू नयेत.कोणत्याही कामगारास सलग सात दिवस ओव्हरटाइम देऊ नये तसेच कोणत्याही तिमाहीत ओव्हरटाइमचे तास हे ११५ तासांपेक्षा जास्त असू नयेत. ही सूट ३० जूनपर्यंत राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्यांच्या मालकांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली पाहिजे. कारखान्यांमधील उत्पादक प्रक्रियेदरम्यान दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर अनिवार्य करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार