शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:32 IST

कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल.

- विशेष प्रतिनिधी मुंबई : कारखान्यांनी आपल्या कामगारांना एक आठवड्यात ६० तासांपेक्षा अधिक काम देऊ नये, असा आदेश राज्याच्या कामगार विभागाने काढला आहे. त्यात कामगारांसंदर्भात काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढलेल्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांच्या ओव्हरटाइमचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने दिले पाहिजे.कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल. कोणत्याही दिवशी कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. कामाचे तास हे विश्रांतीच्या वेळेसह १३ तासांपेक्षा अधिक असू नयेत. कोणत्याही आठवड्यात एकूण कामाचे तास साआठ तासांपेक्षा अधिक असू नयेत.कोणत्याही कामगारास सलग सात दिवस ओव्हरटाइम देऊ नये तसेच कोणत्याही तिमाहीत ओव्हरटाइमचे तास हे ११५ तासांपेक्षा जास्त असू नयेत. ही सूट ३० जूनपर्यंत राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्यांच्या मालकांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली पाहिजे. कारखान्यांमधील उत्पादक प्रक्रियेदरम्यान दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर अनिवार्य करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार