शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

By यदू जोशी | Updated: May 16, 2020 06:24 IST

कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे.

- यदु जोशीमुंबई : प्लॉकडाऊनच्या काळात जवळपास दीड महिना कापसाची खरेदी बंद असल्याने सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांचा ५० लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. कापसाची आवक होणाºया वाहनांची संख्या व अशा केंद्रांवर काम करणाºया कामगारांच्या संख्येवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी निर्बंध आणले असल्यामुळे कापूस खरेदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी पूर्ण होणे आवश्यक आहे.पणन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे शेतमाल मोठ्या बाजार समित्यांमध्ये पाठविता आला नाही.३०६ बाजार समित्यांपैकी सुमारे २६० ते २७० बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे व्यवहार सुरू असले तरी त्याची गती अतिशय धीमी आहे. मुंबई, पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, पॅकिंगचे काम प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारी कामगार करतात. रावेरच्या केळी बाजारात परप्रांतीय, विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर तेलंगणातील तर नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. अनेक जण मूळ गावी गेल्याने या बाजारांना फटका बसला आहे.खासगी बाजार, एकल परवानाधारक व थेट खरेदी परवानाधारकांनी कामगाराअभावी खरेदी बंद ठेवली. ई नाम व्यवस्थेलाही कोरोनाचा फटका बसला.आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे एप्रिल २०१९ मधील २.४५ लाख मे. टन निर्यातीच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये २.३० लाख मे. टन झाली आहे.व्यवस्था पूर्ववदावर आणण्याचे प्रयत्नशेतकरी आणि ग्राहकांना जोडणारी अत्यंत परिणामकारक अशी पणन व्यवस्था राज्यात पूर्वीपासून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कोलमडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.- बाळासाहेब पाटील,मंत्री, पणन विभागअसे होत आहे नुकसानलॉकडाऊनपासून सर्व बाजार समित्यामधील जनावरांचा बाजार बंद आहे. पुरेशा प्रमाणात शेतमजूर / काढणीयंत्र चालवणारे वाहनचालक उपलब्ध नसल्याने काही प्रमुख शेतमालाच्या काढणीवर परिणाम झाला.शेतमाल बाजार आवारात पोहोचल्यानंतर तेथे मालाची हाताळणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतमाल काढण्याच्या प्रक्रियेस विलंबबाजार आवारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे हमाल, मापारी या घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हॉटेल, रेस्टॉरंट वसतिगृहातील कँटीन, इतर धार्मिक सामाजिक, कौटुंबिक समारंभ बंद असल्यामुळे शेतमालाची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती