शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

By यदू जोशी | Updated: May 16, 2020 06:24 IST

कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे.

- यदु जोशीमुंबई : प्लॉकडाऊनच्या काळात जवळपास दीड महिना कापसाची खरेदी बंद असल्याने सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांचा ५० लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. कापसाची आवक होणाºया वाहनांची संख्या व अशा केंद्रांवर काम करणाºया कामगारांच्या संख्येवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी निर्बंध आणले असल्यामुळे कापूस खरेदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी पूर्ण होणे आवश्यक आहे.पणन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे शेतमाल मोठ्या बाजार समित्यांमध्ये पाठविता आला नाही.३०६ बाजार समित्यांपैकी सुमारे २६० ते २७० बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे व्यवहार सुरू असले तरी त्याची गती अतिशय धीमी आहे. मुंबई, पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, पॅकिंगचे काम प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारी कामगार करतात. रावेरच्या केळी बाजारात परप्रांतीय, विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर तेलंगणातील तर नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. अनेक जण मूळ गावी गेल्याने या बाजारांना फटका बसला आहे.खासगी बाजार, एकल परवानाधारक व थेट खरेदी परवानाधारकांनी कामगाराअभावी खरेदी बंद ठेवली. ई नाम व्यवस्थेलाही कोरोनाचा फटका बसला.आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे एप्रिल २०१९ मधील २.४५ लाख मे. टन निर्यातीच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये २.३० लाख मे. टन झाली आहे.व्यवस्था पूर्ववदावर आणण्याचे प्रयत्नशेतकरी आणि ग्राहकांना जोडणारी अत्यंत परिणामकारक अशी पणन व्यवस्था राज्यात पूर्वीपासून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कोलमडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.- बाळासाहेब पाटील,मंत्री, पणन विभागअसे होत आहे नुकसानलॉकडाऊनपासून सर्व बाजार समित्यामधील जनावरांचा बाजार बंद आहे. पुरेशा प्रमाणात शेतमजूर / काढणीयंत्र चालवणारे वाहनचालक उपलब्ध नसल्याने काही प्रमुख शेतमालाच्या काढणीवर परिणाम झाला.शेतमाल बाजार आवारात पोहोचल्यानंतर तेथे मालाची हाताळणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतमाल काढण्याच्या प्रक्रियेस विलंबबाजार आवारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे हमाल, मापारी या घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हॉटेल, रेस्टॉरंट वसतिगृहातील कँटीन, इतर धार्मिक सामाजिक, कौटुंबिक समारंभ बंद असल्यामुळे शेतमालाची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती