शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

By यदू जोशी | Updated: May 16, 2020 06:24 IST

कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे.

- यदु जोशीमुंबई : प्लॉकडाऊनच्या काळात जवळपास दीड महिना कापसाची खरेदी बंद असल्याने सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांचा ५० लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. कापसाची आवक होणाºया वाहनांची संख्या व अशा केंद्रांवर काम करणाºया कामगारांच्या संख्येवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी निर्बंध आणले असल्यामुळे कापूस खरेदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी पूर्ण होणे आवश्यक आहे.पणन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे शेतमाल मोठ्या बाजार समित्यांमध्ये पाठविता आला नाही.३०६ बाजार समित्यांपैकी सुमारे २६० ते २७० बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे व्यवहार सुरू असले तरी त्याची गती अतिशय धीमी आहे. मुंबई, पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, पॅकिंगचे काम प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारी कामगार करतात. रावेरच्या केळी बाजारात परप्रांतीय, विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर तेलंगणातील तर नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. अनेक जण मूळ गावी गेल्याने या बाजारांना फटका बसला आहे.खासगी बाजार, एकल परवानाधारक व थेट खरेदी परवानाधारकांनी कामगाराअभावी खरेदी बंद ठेवली. ई नाम व्यवस्थेलाही कोरोनाचा फटका बसला.आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे एप्रिल २०१९ मधील २.४५ लाख मे. टन निर्यातीच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये २.३० लाख मे. टन झाली आहे.व्यवस्था पूर्ववदावर आणण्याचे प्रयत्नशेतकरी आणि ग्राहकांना जोडणारी अत्यंत परिणामकारक अशी पणन व्यवस्था राज्यात पूर्वीपासून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कोलमडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.- बाळासाहेब पाटील,मंत्री, पणन विभागअसे होत आहे नुकसानलॉकडाऊनपासून सर्व बाजार समित्यामधील जनावरांचा बाजार बंद आहे. पुरेशा प्रमाणात शेतमजूर / काढणीयंत्र चालवणारे वाहनचालक उपलब्ध नसल्याने काही प्रमुख शेतमालाच्या काढणीवर परिणाम झाला.शेतमाल बाजार आवारात पोहोचल्यानंतर तेथे मालाची हाताळणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतमाल काढण्याच्या प्रक्रियेस विलंबबाजार आवारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे हमाल, मापारी या घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हॉटेल, रेस्टॉरंट वसतिगृहातील कँटीन, इतर धार्मिक सामाजिक, कौटुंबिक समारंभ बंद असल्यामुळे शेतमालाची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती