शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

CoronaVirus News: जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 21:54 IST

आपल्या हिमतीवर महाराष्ट्र घडवू; मुख्यमंत्र्यांची जनतेला भावनिक साद

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी असून आपण कोरोना संकटाचा वापर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी करू, अशी साद मोदींनी घातली. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी वापरलेल्या आत्मनिर्भर शब्दाचा खास उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्यासाठी कोरोना संकट संपल्यानंतर सगळ्यांनी जोमानं कामाला लागायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रीन झोनमधले उद्योगधंदे सुरू केले गेले आहेत. या भागातील नागरिकांनी आता महाराष्ट्राला उभं करण्यासाठी पुढे यावं, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. आतापर्यंत सरकारचं ऐकून नागरिक घरात राहिले. मात्र आता उद्योगधंदे सुरू झालेल्या भागातल्या लोकांनी घराबाहेर पडावं. राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपला महाराष्ट्र लढवय्या असल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यातले लाखो परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. महाराष्ट्रात असताना त्यांची उत्तम व्यवस्था सरकारनं केली. मात्र त्यांना घरी जायचं होतं. त्यासाठीही सरकारनं उत्तम नियोजन केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. परप्रांतीय कामगार, मजूर परतले असताना आता राज्यातल्या भूमिपुत्रांनी पुढे यावं. आपण आपल्या पायावर महाराष्ट्र उभा करू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर शब्दाचा वापर केला.लवकर लॉकडाऊन केल्यानं राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. लॉकडाऊन करण्यास उशीर झाला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील उद्योगधंदे हळूहळू सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू करण्यात आले असून त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत, अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. कोरोनानंतर राज्यात येणाऱ्या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली आहे. ग्रीन उद्योगांसाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. त्यांना कोणत्याही परवानगीशिवाय उद्योग सुरू करता येतील. कोरोनानंतर आपण राज्यात नवं उद्योगपर्व सुरू करू, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक सादकोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अटचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे