शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

CoronaVirus News: जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 21:54 IST

आपल्या हिमतीवर महाराष्ट्र घडवू; मुख्यमंत्र्यांची जनतेला भावनिक साद

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी असून आपण कोरोना संकटाचा वापर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी करू, अशी साद मोदींनी घातली. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी वापरलेल्या आत्मनिर्भर शब्दाचा खास उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्यासाठी कोरोना संकट संपल्यानंतर सगळ्यांनी जोमानं कामाला लागायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रीन झोनमधले उद्योगधंदे सुरू केले गेले आहेत. या भागातील नागरिकांनी आता महाराष्ट्राला उभं करण्यासाठी पुढे यावं, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. आतापर्यंत सरकारचं ऐकून नागरिक घरात राहिले. मात्र आता उद्योगधंदे सुरू झालेल्या भागातल्या लोकांनी घराबाहेर पडावं. राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपला महाराष्ट्र लढवय्या असल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यातले लाखो परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. महाराष्ट्रात असताना त्यांची उत्तम व्यवस्था सरकारनं केली. मात्र त्यांना घरी जायचं होतं. त्यासाठीही सरकारनं उत्तम नियोजन केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. परप्रांतीय कामगार, मजूर परतले असताना आता राज्यातल्या भूमिपुत्रांनी पुढे यावं. आपण आपल्या पायावर महाराष्ट्र उभा करू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर शब्दाचा वापर केला.लवकर लॉकडाऊन केल्यानं राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. लॉकडाऊन करण्यास उशीर झाला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील उद्योगधंदे हळूहळू सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू करण्यात आले असून त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत, अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. कोरोनानंतर राज्यात येणाऱ्या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली आहे. ग्रीन उद्योगांसाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. त्यांना कोणत्याही परवानगीशिवाय उद्योग सुरू करता येतील. कोरोनानंतर आपण राज्यात नवं उद्योगपर्व सुरू करू, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक सादकोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अटचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे