शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

CoronaVirus मजुरांचे स्थलांतर राज्याला शोभा देणारं नाही, त्यापेक्षा...; छगन भुजबळांनी सुचवला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 21:12 IST

उद्धव ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली.

नाशिक : कोरोना लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेले मजूर माघारी जात आहेत. हे चित्र खूप विदीर्ण असून राज्याला शोभा देणारे नसल्याचे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आपण नाराजी व्यक्त केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली. याबाबतची भुजबळ यांची मुलाखत एबीपी माझाने घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. कोरोना एक-दोन वर्षांचा सोबती आहे. कन्टोन्मेंट भाग सोडता उर्वरित राज्यातील दुकाने, उद्योग सुरु करायला हवे होते. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत आहे. मंत्र्यांकडे काहीच अधिकार नाहीत. कलेक्टर, कमिशनरला अधिकार आहेत. त्यांचे ते अधिकारच आहेत. पण प्रत्येक अधिकारी आपापले नियम लावत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने पत्रक पाठविले तर त्यात वेगळी डोकी लावली जात आहेत, असा आरोप केला आहे. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, असे भुजबळ म्हणाले. 

पंतप्रधानांनी लॉकडाऊन अचानक जाहीर केला ते चुकीचे होते. काही कालावधी द्यायला हवा होता. ट्रम्प येण्याआधीपासून कोरोनाची जगात सुरुवात झाली होती. चार दिवसांनंतर सारे बंद ठेवले जाईल. दोन महिने सर्व बंद ठेवणार आहेत हे सांगायला हवे होते. जेणेकरून अडकलेले हे मजूर गावी गेले असते. आता या मजुरांना उद्योग धंदे सुरु होतील याची शाश्वती द्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. 

नागरिकांची सोय होणे गरजेचे...राज्यात एसटी सुरु होणार आहेत. लोकांना घराची ओढ आहे. त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडू नये. कोरोनाचा प्रसार न होण्याची काळजी घ्यावी. प्रमाणपत्रासाठीही रांगा लागत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचा भारतात चुकीचा अर्थ लागतो. फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य आहे, असे ते म्हणाले. आपण सगळेच नवीन आहोत. माझ्या उभ्या आयुष्यात अशी लढाई पाहिली नाही, असे ते म्हणाले. दुकाने जास्त उघडी असतील आणि जास्त वेळ असेल तर लोक पांगतील. हे लक्षात घ्यायला हवे. अनुभवातून हे निर्णय घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा

SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या