शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Coronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:07 IST

अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती.भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या टीकेवरुन संताप मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली होती टीका

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.

भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटचं, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा भोगावी लागेलच’ असं उत्तर दिल्याने सोशल मीडियात अवधूत वाघ यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात लॉकडाऊन जाहीर केले. पण लॉकडाऊनची घोषणा रात्री ८ वाजता करण्यात आली. त्यावरुन मंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी ही घोषणा करुन जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता असं मत मांडले होतं. त्यावरुन अवधूत वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या संकटच्या काळात कोरोनाची बाधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची काय अवस्था असेल हे समजून घेण्याचा अवधूत वाघ यांनी प्रयत्न करावा, परमेश्वर त्यांना येणाऱ्या काळात अधिक संवेदनशील बनवो असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही, तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ट्विट डावखरे यांनी केलं होतं. यावरुनही सोशल मीडियात डावखरेंच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. राजकारण आम्हाला पण येतं पण ही वेळ नाही असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी