शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Coronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:07 IST

अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती.भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या टीकेवरुन संताप मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली होती टीका

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.

भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटचं, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा भोगावी लागेलच’ असं उत्तर दिल्याने सोशल मीडियात अवधूत वाघ यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात लॉकडाऊन जाहीर केले. पण लॉकडाऊनची घोषणा रात्री ८ वाजता करण्यात आली. त्यावरुन मंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी ही घोषणा करुन जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता असं मत मांडले होतं. त्यावरुन अवधूत वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या संकटच्या काळात कोरोनाची बाधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची काय अवस्था असेल हे समजून घेण्याचा अवधूत वाघ यांनी प्रयत्न करावा, परमेश्वर त्यांना येणाऱ्या काळात अधिक संवेदनशील बनवो असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही, तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ट्विट डावखरे यांनी केलं होतं. यावरुनही सोशल मीडियात डावखरेंच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. राजकारण आम्हाला पण येतं पण ही वेळ नाही असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी