शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'हे' कोरोना अन् लॉकडाऊनचेच बळी, मजुरांसाठी सरकारने नेमकं केलं काय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:03 IST

Aurangabad Tragedy : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.

ठळक मुद्देघराच्या ओढीने पायीच निघालेल्या 16 मजुरांचा शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.    सरकारला जर लॉकडाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता

मुंबईः लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकून पडलेल्या आणि घराच्या ओढीने पायीच निघालेल्या 16 मजुरांचा शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटेच्या गार वाऱ्यात  रेल्वे रुळांवर काही क्षण विसावले होते. इतक्यात, धडाडत आलेल्या एका मालगाडीनं त्यांना चिरडलं आणि होत्याचं नव्हतं झालं. ही बातमी  देशवासीयांना चटका लावून गेली. सर्वच स्तरांतून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असताना, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.    

औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले 16 मजूर हे कोरोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत आणि त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी शासनावरच येते. स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत सरकारने नेमके केले काय? ना त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या, ना त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. सरकारला जर लॉकडाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता, असं टीकास्त्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर सोडण्यात आलंय. घरी किंवा झोपडीत बसून मरायचेच आहे. कदाचित कोरोनानेही मरावे लागेल. त्यापेक्षा बाहेर पडावे, घराकडे जावे. मेलो तरी बेहत्तर, या विचारापर्यंत लोक पोहोचले असतील तर ते भयंकर आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केलीय.

अग्रलेखातील ठळक मुद्देः

>> भाकरीसाठी त्यांनी स्वत:चे गाव सोडले, ती भाकरीच 'लॉक डाऊन'ने हिरावून घेतली. त्याच भाकरीच्या शोधात ते रेल्वे रुळावरून चालत निघाले. घरी पोहोचलेच नाहीत व त्यांच्या मृतदेहांच्या बाजूला प्रवासासाठी बांधून घेतलेल्या भाकऱ्याच विखुरलेल्या दिसल्या. अशा भाकरीचे बळी हेसुद्धा कोरोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. हे बळी कधी थांबणार?

>> कोरोनाच्या संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील स्थलांतरित मजूर आपल्या राज्यांत परत जावेत यासाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शर्थ करीत आहेत. पण शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रात भयंकर घडले.

>> औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांनासुद्धा कोरोना बळींच्याच यादीत समाविष्ट केले पाहिजे. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी शासनावरच येते.

>> कोरोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून 'लॉकडाऊन' केलं, पण मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये एकतर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे.

>> पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व ठीक आहे, पण गेलेल्या जिवांचे काय? उघड्या पडलेल्या त्यांच्या कुटुंबांचे काय?

>> स्थलांतरित मजुरांचा प्रश्न फक्त मुंबई-महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण देशाचा आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडले आहेत. या सगळ्या मजुरांना आपापल्या घरी जायचे आहे, पण व्यवस्था काहीच नसल्याने ते आपल्या कच्च्या-बच्च्यांसह मैलोन्मैल पायीच निघाले आहेत व सरकार हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे.

>> सरकारला जर लॉक डाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता. बरं, पहिल्या लॉक डाऊनपर्यंत ठीक होते, पण हा दुसरा लॉक डाऊन वाढवल्यावर लोकांचा धीर सुटला व लोक बेपर्वा होऊन वाटा फुटतील तिथे जाऊ लागले.

>> ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था मार्गी लागली नाही आणि जर अशी व्यवस्था एखाद्या सरकारी कागदावर बनवली असेल तर त्यात या अशा मजूरवर्गास स्थान नाही.

>> पंतप्रधान मोदी व राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री रोज आवाहन करीत आहेत की, 'घराबाहेर पडू नका. आहेत तिथेच थांबा.' पण लोक ऐकत नाहीत व बाहेर पडत आहेत. सरकारने 'लॉकडाऊन'चे नियम कठोर केले आहेत. तरीही हे असे मजूर झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतात व त्यांना कोणतीही सरकारी यंत्रणा अडवत नाही. याचा अर्थ सरकारी यंत्रणा ढिली पडली आहे, पण त्याहीपेक्षा लोकांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे.

संबंधित बातम्याः 

आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल; उद्धव ठाकरेंचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

बिनचेहऱ्याचे बळी; ही वेळ नियोजन करून टाळता आली असती पण...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना