शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

'हे' कोरोना अन् लॉकडाऊनचेच बळी, मजुरांसाठी सरकारने नेमकं केलं काय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:03 IST

Aurangabad Tragedy : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.

ठळक मुद्देघराच्या ओढीने पायीच निघालेल्या 16 मजुरांचा शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.    सरकारला जर लॉकडाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता

मुंबईः लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकून पडलेल्या आणि घराच्या ओढीने पायीच निघालेल्या 16 मजुरांचा शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटेच्या गार वाऱ्यात  रेल्वे रुळांवर काही क्षण विसावले होते. इतक्यात, धडाडत आलेल्या एका मालगाडीनं त्यांना चिरडलं आणि होत्याचं नव्हतं झालं. ही बातमी  देशवासीयांना चटका लावून गेली. सर्वच स्तरांतून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असताना, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.    

औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले 16 मजूर हे कोरोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत आणि त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी शासनावरच येते. स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत सरकारने नेमके केले काय? ना त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या, ना त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. सरकारला जर लॉकडाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता, असं टीकास्त्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर सोडण्यात आलंय. घरी किंवा झोपडीत बसून मरायचेच आहे. कदाचित कोरोनानेही मरावे लागेल. त्यापेक्षा बाहेर पडावे, घराकडे जावे. मेलो तरी बेहत्तर, या विचारापर्यंत लोक पोहोचले असतील तर ते भयंकर आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केलीय.

अग्रलेखातील ठळक मुद्देः

>> भाकरीसाठी त्यांनी स्वत:चे गाव सोडले, ती भाकरीच 'लॉक डाऊन'ने हिरावून घेतली. त्याच भाकरीच्या शोधात ते रेल्वे रुळावरून चालत निघाले. घरी पोहोचलेच नाहीत व त्यांच्या मृतदेहांच्या बाजूला प्रवासासाठी बांधून घेतलेल्या भाकऱ्याच विखुरलेल्या दिसल्या. अशा भाकरीचे बळी हेसुद्धा कोरोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. हे बळी कधी थांबणार?

>> कोरोनाच्या संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील स्थलांतरित मजूर आपल्या राज्यांत परत जावेत यासाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शर्थ करीत आहेत. पण शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रात भयंकर घडले.

>> औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांनासुद्धा कोरोना बळींच्याच यादीत समाविष्ट केले पाहिजे. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी शासनावरच येते.

>> कोरोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून 'लॉकडाऊन' केलं, पण मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये एकतर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे.

>> पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व ठीक आहे, पण गेलेल्या जिवांचे काय? उघड्या पडलेल्या त्यांच्या कुटुंबांचे काय?

>> स्थलांतरित मजुरांचा प्रश्न फक्त मुंबई-महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण देशाचा आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडले आहेत. या सगळ्या मजुरांना आपापल्या घरी जायचे आहे, पण व्यवस्था काहीच नसल्याने ते आपल्या कच्च्या-बच्च्यांसह मैलोन्मैल पायीच निघाले आहेत व सरकार हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे.

>> सरकारला जर लॉक डाऊन करायचेच होते तर समाजातील या दीनदुबळ्या घटकांचा विचार आधी करायलाच हवा होता. बरं, पहिल्या लॉक डाऊनपर्यंत ठीक होते, पण हा दुसरा लॉक डाऊन वाढवल्यावर लोकांचा धीर सुटला व लोक बेपर्वा होऊन वाटा फुटतील तिथे जाऊ लागले.

>> ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था मार्गी लागली नाही आणि जर अशी व्यवस्था एखाद्या सरकारी कागदावर बनवली असेल तर त्यात या अशा मजूरवर्गास स्थान नाही.

>> पंतप्रधान मोदी व राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री रोज आवाहन करीत आहेत की, 'घराबाहेर पडू नका. आहेत तिथेच थांबा.' पण लोक ऐकत नाहीत व बाहेर पडत आहेत. सरकारने 'लॉकडाऊन'चे नियम कठोर केले आहेत. तरीही हे असे मजूर झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतात व त्यांना कोणतीही सरकारी यंत्रणा अडवत नाही. याचा अर्थ सरकारी यंत्रणा ढिली पडली आहे, पण त्याहीपेक्षा लोकांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे.

संबंधित बातम्याः 

आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल; उद्धव ठाकरेंचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

बिनचेहऱ्याचे बळी; ही वेळ नियोजन करून टाळता आली असती पण...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना