शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या वाढविणे आणि रूग्णांचे विलगीकरण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:39 IST

संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा..

ठळक मुद्देशास्त्रज्ञांच्या गटाचा निष्कर्ष : इंडिया सिम हे गणितीय प्रतिमान विकसितदेशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा समावेश

पुणे : लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. पण मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनचा फायदा होण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर केलेल्या चाचण्या आणि आढळून आलेल्या रूग्णांचे विलगीकरण यांचीही जोड गरजेची आहे. चाचण्या वाढविल्यामुळे बाधित लोक अधिक प्रमाणावर समोर येतील. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकेल, असा निष्कर्ष 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या शास्त्रज्ञांच्या गटाने काढला आहे. या गटाने विकसित केलेल्या इंडिया-सिम या गणितीय प्रतिमानानुसार करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे.कोरोनाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या विविध प्रयत्न करणे तसेच कोरोना प्रसाराचे गणिती प्रतिमान तयार करण्यासाठी 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या गटाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. यातील गणिती प्रतिमानाचे काम करणाऱ्या उपगटाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे (सीएमएस) डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर हे करत आहेत. चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्था आणि बेंगालूरू येथील भारतीय विज्ञान संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा देखिल या गटात समावेश आहे. या गटाने ' इंडिया सिम' हे भारतातील रोगप्रसाराचा अभ्यास करण्यासाठीचे गणितीय प्रतिमान विकसित करण्यात आले असून, भारतासाठीचे आत्तापर्यंतचे हे सर्वांत व्यापक प्रतिमान आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.या प्रतिमानाचा उपयोग शहरे, जिल्हे आणि राज्य अशा विविध पातळ्यांवर आरोग्यसेवांशी संबंधित संसाधनांचे आणि विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी करता येणार आहे. त्यासाठीचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. साथीवर वेगवेगळ्या प्रकारचे लॉकडाउन, संशयित किंवा बाधीतांचे विलगीकरण, रोगाच्या चाचण्यांची संख्या इत्यादी गोष्टींचा कसा परिणाम होऊ शकेल याची तुलना करणे शक्य होणार आहे. प्रतिमानामुळे पुढे आपल्याला किती खाटांची आणि अतिदक्षता विभागांची गरज पडेल याचा अंदाज बांधता येणार आहे.-------------------संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे. पण केवळ जास्त कालावधीचा लॉकडाऊन असल्याने संसर्ग थांबणार नाही. त्यासाठी ठराविक झोनमधील चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतील. चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्ण समोर येतील. ते जेवढे जास्त आढळतील, तेवढे संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यांची चाचणी केली नाही, तर ते इतरांना बाधित करण्याचा धोका असतो. त्यांच्यामुळे ही साखळी आणखी वाढत जाते. त्यामुळे लोकांना शोधून त्यांच्या चाचण्या करायला हव्यात. तरच लॉकडाऊनचा कालावधी कमी करता येईल. याचप्रमाणे ग्रीन झोनमधील लॉकडाऊनची स्थिती, वाहतुक यंत्रणा, शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील संसर्ग, सुविधा आदी बाबींचाही अभ्यास केला जात आहे.- डॉ. स्नेहल शेकटकरसदस्य, इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड---------------------—

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर