शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:34 IST

आई-वडिलांना भेटा, मुलांबरोबर गप्पा मारा, खेळही खेळा

ठळक मुद्देमनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचेसार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्या

पुणे : तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या अगदी शेजारी बसून, त्यांचे हात हातात घेऊन शांतपणे बोलला त्याला किती दिवस झाले? मुलांबरोबर काही खेळ खेळलात, ते आठवते आहे का? बायकोला घरकामात शेवटची मदत कधी केली होती! पाहा बरं थोडं आठवून!  या सगळ्या प्रश्नांची अनेकांच्या बाबतीत नकारार्थी असलेली उत्तरे सकारात्मक करण्याची संधी आहे. कोरोनामुळे झालेल्या ‘बंद’मधून ही संधी आली असल्याचे बहुसंख्य मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेने अनेक पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, जाहीर सभा, संवाद, मुलाखती असे सगळे काही बंद आहे. इतकेच नव्हे तर शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या परीक्षाही काही कालावधीपुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कुठेही जाऊ नका, अनावश्यक फिरू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. याचा सरळ अर्थ सगळे काही बंद करून घरात बसा असाच आहे. फक्त बसून करायचे काय, असा प्रश्न त्यातूनच निर्माण झाला आहे.त्यावरच काही मानसोपचार तज्ज्ञ; तसेच डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी ही तर मोठीच संधी आहे, असे मत व्यक्त केले.  समुपदेशक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, ही संधी आहे आपल्याच मुलांना वेळ देण्याची, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची. इतर वेळी कामाचा व्याप, कामाचा ताण यामुळे मुलांना क्वॉलिटी टाइम देता येत नाही. आपण घरी, तर मुले झोपलेली व आपण जागे, तर ती शाळेत गेलेली असेच होत असते. आता सगळेच घरी, तर त्यांच्याबरोबर बसा, फक्त बसाच नाही तर त्यांच्याबरोबर खेळा, त्यांना हस्तकला, चित्रकला, शिल्पकला असे काहीतरी करायला शिकवा व तुम्हीही शिका. बोटांचा वापर फक्त मोबाईलसाठी असेच काहीसे झाले आहे. बोटं वापरून कातरकाम, चिकटवही, शिल्प, चित्र करता येतात, अन्यही बरेच काही करता येते हे मुलांना यानिमित्ताने सांगता येईल, दाखवता येईल.चौकोनी किंवा हल्ली तर त्रिकोणी कुटुंबव्यवस्थेमुळे तरुण पिढीसाठी त्यांच्या आईवडिलांचे वेगळे व स्वतंत्र असे जग झाले आहे. त्यांचाच मुलगा त्यांना कित्येक दिवस भेटत नाही, भेटला तरी बोलत नाही, बोलला तरी त्यात संवाद नसतो तर फक्त विचारापासून व तीसुद्धा कोरडीच असाच अनेकांचा अनुभव आहे. तो बदलण्याची संधी या सार्वजनिक ‘बंद’मुळे आली असल्याचे काही मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे........मनाचे आरोग्य सुधारेलमनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचे असते. हे फक्त नात्यापुरतेच नाही, तर मित्र-मैत्रिणींसाठीही तेवढेच गरजेचे आहे. नेमका हा सुसंवादच आपण मोबाईल किंवा संगणकाच्या पडद्याबरोबर मैत्री केल्यामुळे हरवला आहे. या सार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ शकतो. हाही वेळ पुन्हा मोबाईलवर किंवा कोणत्याही स्क्रीनवर घालवू नका, असे माझे आवाहन आहे. घरातल्यांबरोबर बोला, नातेवाइकांबरोबर बोला, बोलत राहा.-डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ..........राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्याफक्त मुले किंवा आईवडिलांबरोबरच बोला असे नाही, तर तुमची, तुम्हाला करावे असे वाटलेली पण करता आली नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्ही या काळात करू शकता. त्यात गाणी ऐकणे व वाचन-लेखन करणेही आले. वेळ मिळाला आहे तर तो सर्वांबरोबर घालवा, तसेच स्वत:लाही द्या. मनाच्या आरोग्यासाठी तेही गरजेचेच असते.-डॉ. श्रुती पानसे, समुपदेशक 

........

स्वत:चा शोध घेणे ही बहुतेकांना आध्यात्मिक गोष्ट वाटेल; मात्र ती मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. असा वेळ आपण आपल्याला कधीच देत नाही, तो या सार्वजनिक ‘बंद’मुळे देता येईल. यातून तुम्ही तुमच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घ्या, त्यातून मग एक चांगले तुम्हाला योग्य वाटेल असे वेळापत्रक तयार करा. पहिल्या टप्प्याचा विचार करतानाच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घरात किंवा नात्यात काहीच वेळ देत नाही आहात. तेवढे उमजले की मग पुढचे सगळे आपोआप होईल.    - डॉ. भूषण म्हेत्रे, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायjobनोकरीState Governmentराज्य सरकारrelationshipरिलेशनशिप