शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:07 IST

लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देन्यायालयाचे 7वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश

पुणे : राज्यात दरदिवशी वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वांसमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य प्रशासन अखंडपणे कार्यरत आहे. कारागृहात देखील कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यापुढील काळात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहेत. असा आदेश राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी राज्यातील कारागृह प्रशासनाला दिले आहेत.मात्र, या कालावधीत न्यायालयाने सांगितल्यानुसार कैदी सोडण्याची प्रक्रिया मात्र सुरू राहणार आहे.    लॉकडाऊनच्या वेळी कारागृहात कमीत कमी अधिकारी असतील याची काळजी तुरूंग अधीक्षक यांनी घ्यावी. तसेच या काळात कारागृहाचे सर्व दरवाजे अधीक्षकांच्या स्वाक्षरीने बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय  एका महिन्याकरिता पुरेल एवढी साधनसामग्री कारागृहात उपलब्ध आहे याची खात्री करण्यात यावी. अशा सूचना अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा. एखाद्या कैद्याला जामिनावर सोडणे,  वैद्यकीय कारण) यासाठी मुख्य प्रवेशद्वार उघडण्याची गरज भासल्यास अधीक्षकांनी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कारागृह उपमहानिरीक्षक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या लॉकडाऊनच्या काळात  अधीक्षकांनी एका अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. आणि त्या  समन्वय अधिकारी लोक डाऊन मध्ये कारागृहात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहावे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.   लॉकडाऊन मध्ये कारागृहात नियुक्त नसलेले कर्मचारी यांनी स्वत:ला त्यांच्या घरी लॉकडाऊन करावे. पुढे आवश्यकतेनुसार त्यांना सूचना देऊन कामावर बोलून घेण्यात येणार आहे.      संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियावर काही प्रसंग ओढवल्यास त्यांनी तातडीने समन्वय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. लॉकडाऊन किती काळ सुरू ठेवावे याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना पत्र लिहून वसहतीच्या विलगीकरणासाठीआवश्यक त्या पोलीस संरक्षनाची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना रामानंद यांनी आपल्या आदेशातून दिल्या आहेत. 

* न्यायालयाने 7वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील विविध कारागृहातून 3 हजार 271 कैदी सोडण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलjailतुरुंगPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस