शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Corona virus : महाराष्ट्रात राबवावा लागेल 'केरळ पॅटर्न' ; लॉकडाऊननंतरचा काळ परीक्षेचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 17:11 IST

रुग्णसंख्या वाढ रोखण्याचे आव्हान

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यात थोडेफार यश आले असले तरी पुढील काळ आव्हानात्मकजास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिंग आणि सोशल डिस्टन्सिंग हाच सध्याचा प्रभावी पर्याय

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या आणि महाराष्ट्रात पुणे दुस-या क्रमांकावर आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत.  लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यात थोडेफार यश आले असले तरी पुढील काळ आव्हानात्मक असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिंग आणि सोशल डिस्टन्सिंग हाच सध्याचा प्रभावी पर्याय मानला जात आहे. महाराष्ट्रातही 'केरळ मॉडेल' राबवण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.

महाराष्ट्रात २२ एप्रिल पर्यंत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ९०,२२३ नमुन्यांपैकी ८३,९७९ जणांचे नमुने निगेटिव्ह तर ५६४९ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात आतापर्यंत ८३१५ जणांची चाचणी झाली असून, ७१३१ जण निगेटिव्ह निघाले आहेत. रुग्णांची वाढती संख्या ठरावीक परिसरापुरतीच मर्यादित असल्याने सामूहिक संसगार्पासून अद्याप दूर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लॉकडाऊननंतर रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे खरे आव्हान असणार आहे.

भारतातील पहिले तीन रुग्ण केरळमध्ये आढळून आले. त्यानंतर देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत गेला. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०० च्या अलिकडेच रोखण्यात केरळ प्रशासनाला यश आले आहे. सुरुवातीपासून जास्तीत जास्त चाचण्यांवर दिलेला भर, रुग्ण आणि नातेवाईकांचे समुपदेशन, विलगीकरणासाठी नियोजनबद्ध वैद्यकीय देखरेख, आरोग्य सेवकांकडून राज्यभरात करण्यात आलेली जनजागृती आणि प्रशासनाच्या प्रत्येक सुचनेचे नागरिकानी केलेले काटेकोर पालन यामुळे केरळला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महाराष्ट्रात सर्वसमावेशक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून नोंदवले जात आहे.

-----------राज्याच्या ठराविक भागांमध्येच रुग्ण वाढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचायचे असेल तर ट्रेसिंग वाढवावे लागणार आहे. दक्षिण कोरियाप्रमाणे चाचण्यांची लक्षणीय संख्या आपल्याला परवडणारी नाही. मात्र, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी व्हायला हवी. नागरिकांनी स्वत:मध्ये काही लक्षणे आढळल्यास समाजाच्या भीतीने घरातच थांबुन राहता कामा नये. लॉकडाऊनचस उपयोग होत नाही, असे म्हणता येणार नाही. लॉकडाऊन असताना १००० रुग्ण आढळत असतील तर, लॉकडाऊनशिवाय हे प्रमाण १० हजारांच्या घरात गेले असते. लॉकडाऊननंतर रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवायची असेल तर वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हेच पर्याय असतील. ८० टक्के रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे दिसत नसून, ते आपोआप बरे होत आहेत. मात्र, त्यांच्याकडून इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरणावर भर द्यावा लागेल.- डॉ. अनंत फडके, सहसमनव्यक, जनआरोग्य अभियान

------पुण्यात सामूहिक संसगार्ला सुरुवात झालेली नाही. कारण, ठराविक भागांमधील एकाच कुटुंबातील झ संपकार्तील ठळक बाधित आढळून येत आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सुरुवातीला एका दिवशी १०० चाचण्या होत असतील तर आता ते प्रमाण ३००-४०० पर्यंत वाढले आहे. लॉकडाऊननंतर रूग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे हे मोठे आव्हान असेल.- डॉ. संजीव वावरे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळHealthआरोग्यState Governmentराज्य सरकार