शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

कोरोनामुळे अर्थचक्र कोलमडले; बळीराजाने मात्र तारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:30 IST

राज्याचे आर्थिक चित्र; तूट ८ टक्क्यांची; उद्योग क्षेत्रही डबघाईला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला बसलेली खीळ व औद्योगिक उत्पादन कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१)  राज्याच्या आर्थिक विकासात आठ टक्क्यांनी घट झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे की ज्यात ११.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने तारल्याचे चित्रही यानिमित्ताने समोर आले आहे. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार उद्योग व सेवा क्षेत्रात अनुक्रमे ११.३ टक्के व ९ टक्के घट दिसत आहे. कृषी क्षेत्राने मात्र कोरोनाच्या लाटेतही केवळ तगच धरला नाही, तर भरारीदेखील घेतली असे आशादायक चित्र दिसते. कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांतही वाढ झाली आहे. कोरोनाने सगळे जग थांबलेले असताना शेतकरी शेतात राबला आणि त्याने राज्याचा गाडा चालू ठेवला. पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रात अनुक्रमे ४.४ टक्के, ५.७ टक्के आणि २.६ टक्के वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स, उपाहारगृहे आणि वाहतूक या क्षेत्रात ९ टक्के घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

कृषी उत्पादनात वाढगतवर्षीच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस व उसाच्या उत्पादनात अनुक्रमे ६० टक्के, १४ टक्के, २८ टक्के, ३३ टक्के आणि ४० टक्के वाढ आहे. 

महसुलात घटराज्याची २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ३,४७,४५७ कोटी तर २०१९-२०च्या सुधारित अंदाजानुसार ३,०९,८८१ कोटी रु. आहे. अर्थसंकल्पीय अंदाज २०२०-२१ नुसार कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे २,७३,१८१ कोटी व ७४,२७६ कोटी रु. आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा १,७६,४५० कोटी म्हणजे अंदाजाच्या ५० टक्केच आहे. महसुलाबाबत महाराष्ट्र माघारला आहे.

उत्पन्न १ लाख ५७ हजार कोटींनी घटणारविविध करांद्वारे राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. राज्य उत्पन्नात १ लाख ५६ हजार ९२५ कोटींची घट अपेक्षित असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. २०१९-२० मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न २८१८५५५ कोटी रु. इतके होते. यंदा ते २६६१६२९ कोटीपर्यंतच मजल मारू शकणार आहे. 

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वनथेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात नंबर वनच असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. एकूण गुंतवणुकीपैकी २७ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र