शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:14 IST

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे, मात्र त्याआधीच महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळणार असून, विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्यासाठी महायुतीची लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आयोजित केलेल्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असून महायुती ३५ ते ४० जागांवर विजयी होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही अशा प्रकारचे यश मिळण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी असतील. विशेषत: जागावाटपाची जबाबदारी या समितीवर असेल. ज्या पक्षाची संबंधित मतदारसंघात ताकद असेल, तो मतदारसंघ अन्य पक्षाला दिला जाणार नाही. त्यामुळे महायुतीला अधिकाधिक जागा जिंकणे शक्य होईल.

अजित पवार गटात इनकमिंग

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी खासदार व आमदार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दि. २७ मे रोजी मुंबईत होणार आढावा बैठक. 
  • १० तारखेला वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन मुंबई आणि दिल्लीत साजरा करण्याचे नियोजन आहे. त्या बैठकीला सर्व नेते उपस्थित राहतील. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होईल. 
  • हा पक्षप्रवेश राज्याच्या, देशाच्या आणि पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस