शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:40 IST

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे.

डॉ. अविनाश ढाकणेसदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. समितीच्या  बैठकांमध्ये प्रदूषण कसे होते? का होते? त्यावर उपाय काय? याची चर्चा होते, प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. सूचनाही केल्या जातात. त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी महामुंबईमधील इतर प्राधिकरणांच्या मदतीने सुवर्णमध्य साधला जात असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

प्रदूषणकारी घटक कोणते आहेत?उत्तर : मुंबईत पीएम १०चे प्रमाण कमी आहे. दोन ते तीन वर्षांचा विचार करता २०२४ हे वर्ष २०२३  च्या तुलनेत चांगले होते. २०२५मध्ये जानेवारीपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले. याचे कारण प्रदूषण करणारे घटक वाढले आहेत. वाहनांची संख्या, बांधकामे वाढत आहेत. सार्वजनिक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, पुलांची कामे सुरू आहेत. त्यातून निघणारे घटक प्रदूषण वाढवत आहेत.  

प्रदूषण कमी कसे करणार?उत्तर : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण जास्त आहे. धूलिकण, वाहनांचा धूर, जाळण्यात येणारा कचरा आणि अन्य घटकांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘क्लीन एअर प्रोग्राम’ तयार केला आहे. पावसाळ्याचे चार महिने प्रदूषण कमी असते. ऑक्टोबरपासून ते वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये तापमानामध्ये बदल होतात. हवेची दिशा बदलली किंवा हवा स्थिर राहिली की प्रदूषणाचे प्रमाण वाढते. 

बांधकामस्थळी काय उपाययोजना केल्या आहेत?उत्तर : मुंबई पालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण कक्ष सुरू केला आहे. बिल्डरांना बांधकामस्थळी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामस्थळी हवामापक केंद्र बसविण्याबरोबरच तेथे किती प्रदूषण होत आहे? हे दर्शविणारा बोर्ड बिल्डरांना लावण्यास सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करीत आहे. तसेच प्रदूषण पातळी मोजण्यासाठी राज्यात ५० नवी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

नियमउल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होते?उत्तर : बांधकामस्थळावरचा राडारोडा वाहून नेताना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे ५०० आरएमसी प्लांट (रेडीमिक्स काँक्रीट प्लांट) आहेत. त्यांना प्रदूषणाबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण कमी करणे ही सरकारची किंवा एका यंत्रणेची जबाबदारी नाही, तर सर्वसामान्यांचीही जबाबदारी आहे. कारण कुणी कचरा जाळत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहिजे.  

टीकाकारांना काय उत्तर द्याल?उत्तर : टीकाकारांनी टीका केल्याशिवाय आम्हाला अडचणी समजणार नाहीत. मात्र त्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- शब्दांकन : सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाweatherहवामान अंदाजair pollutionवायू प्रदूषण