शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:40 IST

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे.

डॉ. अविनाश ढाकणेसदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. समितीच्या  बैठकांमध्ये प्रदूषण कसे होते? का होते? त्यावर उपाय काय? याची चर्चा होते, प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. सूचनाही केल्या जातात. त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी महामुंबईमधील इतर प्राधिकरणांच्या मदतीने सुवर्णमध्य साधला जात असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

प्रदूषणकारी घटक कोणते आहेत?उत्तर : मुंबईत पीएम १०चे प्रमाण कमी आहे. दोन ते तीन वर्षांचा विचार करता २०२४ हे वर्ष २०२३  च्या तुलनेत चांगले होते. २०२५मध्ये जानेवारीपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले. याचे कारण प्रदूषण करणारे घटक वाढले आहेत. वाहनांची संख्या, बांधकामे वाढत आहेत. सार्वजनिक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, पुलांची कामे सुरू आहेत. त्यातून निघणारे घटक प्रदूषण वाढवत आहेत.  

प्रदूषण कमी कसे करणार?उत्तर : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण जास्त आहे. धूलिकण, वाहनांचा धूर, जाळण्यात येणारा कचरा आणि अन्य घटकांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘क्लीन एअर प्रोग्राम’ तयार केला आहे. पावसाळ्याचे चार महिने प्रदूषण कमी असते. ऑक्टोबरपासून ते वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये तापमानामध्ये बदल होतात. हवेची दिशा बदलली किंवा हवा स्थिर राहिली की प्रदूषणाचे प्रमाण वाढते. 

बांधकामस्थळी काय उपाययोजना केल्या आहेत?उत्तर : मुंबई पालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण कक्ष सुरू केला आहे. बिल्डरांना बांधकामस्थळी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामस्थळी हवामापक केंद्र बसविण्याबरोबरच तेथे किती प्रदूषण होत आहे? हे दर्शविणारा बोर्ड बिल्डरांना लावण्यास सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करीत आहे. तसेच प्रदूषण पातळी मोजण्यासाठी राज्यात ५० नवी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

नियमउल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होते?उत्तर : बांधकामस्थळावरचा राडारोडा वाहून नेताना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे ५०० आरएमसी प्लांट (रेडीमिक्स काँक्रीट प्लांट) आहेत. त्यांना प्रदूषणाबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण कमी करणे ही सरकारची किंवा एका यंत्रणेची जबाबदारी नाही, तर सर्वसामान्यांचीही जबाबदारी आहे. कारण कुणी कचरा जाळत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहिजे.  

टीकाकारांना काय उत्तर द्याल?उत्तर : टीकाकारांनी टीका केल्याशिवाय आम्हाला अडचणी समजणार नाहीत. मात्र त्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- शब्दांकन : सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाweatherहवामान अंदाजair pollutionवायू प्रदूषण