शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 15:50 IST

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gulabrao Patil ( Marathi News ) : राज्यात आज दसऱ्यानिमित्त राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे, मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा होणार असून शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. या मेळाव्यावरुन दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सकाळी खासदार संजय राऊत यांनी आधी शिंदे गटावर टीका केली, या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

"आमचे मुख्यमंत्री १८-१८ तास काम करतात. आतापर्यंत ते जळगावला १९ वेळा आले आहेत. त्यामुळे विरोधक विरोध करतात. शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादी मिक्स विचार आहेत. तिकडे फक्त चांदी मिक्स विचार असणार आहेत. जमलेल्या तमाम राष्ट्रभक्तांनो म्हणतील बाकीचे शब्द ते विसरले आहेत. आमचे इकडे हिंदूत्वाचे विचार असणार आहेत, असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. 

"बाळासाहेबांच्या विचारांचे जे सोनं आम्ही लुटायचो ते फक्त इकडेच मिळणार आहे. तिकडे चांदी मिक्स विचार असणार आहेत, असंही पाटील म्हणाले. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर होत असते. आता लोक काम करणाऱ्याच्या मागे असतात. त्यामुळे आता महायुतीच्या मागे लोक असणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राऊत साहेब यांची स्टाईल बघा आज, स्वत:ला बाळासाहेब समजत आहेत. उद्धव ठाकरे यांना उलट-सुलट सांगून त्यांनी राज्यात सगळ वाटोळ केलं आहे, असा टोलाही संजय राऊत यांना पाटील यांनी लगावला.

संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

"या देशात ५० वर्षापेक्षा अधिक काळ एकच दसरा मेळावा होतो, जिथे विचारांचं सानं लुटलं जातं. तो म्हणजे शितीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. माझ्या माहिती प्रमाणे देशात दोन मेळावे होतात, एक नागपूरात आरएसएसचा आणि मुंबईत  शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. आता मेळाव्याची लाट आली आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात मेळावे करतात, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 

"प्रत्येक दसऱ्याला विचारांचं सोनं बाळासाहेब ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला देत राहिले. आता तिच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली आहे. तुम्ही भले पक्षाचं चिन्ह नाव चोरले असेल तरीही विचार , जनता ही मुळ शिवसेनेसोबत आहे. निवडणूक आयोग शिवसेना कोणाची हे ठरवू शकत नाही. या राज्यातील जनतेने हा निर्णय घेतला आहे. आजचा दसरा मेळावा हा विधानसभेच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार आहे. आज एक दिशा महाराष्ट्राला लाभेल, असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत