शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:40 IST

Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागतेय, याची वाट पाहत आहे. महायुती सरकारने राज्य विकून खाल्ले आहे. महाराष्ट्राची अस्मिता विकली आहे. महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. राज्यातील जनतेला याचा बदला घ्यायचा आहे. महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीला सक्षमतेने सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब आणि झालेला शपथविधी घटनाबाह्य आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राज्यपाल नियुक्त सात आमदारांसाठी आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली, असा आम्हाला संशय आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने घेतलेला निर्णय

मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर लहान वाहनांना संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुजरातकडे अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांचा बदला घेण्याची संधी आता आली आहे. पुतळ्यात कमिशन खाणाऱ्या लोकांचा बदला जनता घेईल. शेतकरी अडचणीत आला. कमिशनखोरी केली जाते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ बदल्या करुन घेतल्या आहेत. याआधी असे कधीच झाले नव्हते. मुख्यमंत्री हे निवडणूक काळात ही हंगामी मुख्यमंत्री असतात. नवीन सरकार येईपर्यंत ते स्टाफ बदलत नाही. जर अधिकारी यांनी बदली करुन घेतली असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली असे म्हणता येईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahayutiमहायुती