शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:40 IST

Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागतेय, याची वाट पाहत आहे. महायुती सरकारने राज्य विकून खाल्ले आहे. महाराष्ट्राची अस्मिता विकली आहे. महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. राज्यातील जनतेला याचा बदला घ्यायचा आहे. महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीला सक्षमतेने सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब आणि झालेला शपथविधी घटनाबाह्य आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राज्यपाल नियुक्त सात आमदारांसाठी आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली, असा आम्हाला संशय आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने घेतलेला निर्णय

मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर लहान वाहनांना संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुजरातकडे अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांचा बदला घेण्याची संधी आता आली आहे. पुतळ्यात कमिशन खाणाऱ्या लोकांचा बदला जनता घेईल. शेतकरी अडचणीत आला. कमिशनखोरी केली जाते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ बदल्या करुन घेतल्या आहेत. याआधी असे कधीच झाले नव्हते. मुख्यमंत्री हे निवडणूक काळात ही हंगामी मुख्यमंत्री असतात. नवीन सरकार येईपर्यंत ते स्टाफ बदलत नाही. जर अधिकारी यांनी बदली करुन घेतली असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली असे म्हणता येईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahayutiमहायुती