शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:40 IST

Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागतेय, याची वाट पाहत आहे. महायुती सरकारने राज्य विकून खाल्ले आहे. महाराष्ट्राची अस्मिता विकली आहे. महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. राज्यातील जनतेला याचा बदला घ्यायचा आहे. महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीला सक्षमतेने सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब आणि झालेला शपथविधी घटनाबाह्य आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राज्यपाल नियुक्त सात आमदारांसाठी आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली, असा आम्हाला संशय आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने घेतलेला निर्णय

मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर लहान वाहनांना संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुजरातकडे अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांचा बदला घेण्याची संधी आता आली आहे. पुतळ्यात कमिशन खाणाऱ्या लोकांचा बदला जनता घेईल. शेतकरी अडचणीत आला. कमिशनखोरी केली जाते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ बदल्या करुन घेतल्या आहेत. याआधी असे कधीच झाले नव्हते. मुख्यमंत्री हे निवडणूक काळात ही हंगामी मुख्यमंत्री असतात. नवीन सरकार येईपर्यंत ते स्टाफ बदलत नाही. जर अधिकारी यांनी बदली करुन घेतली असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली असे म्हणता येईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahayutiमहायुती