शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 19:47 IST

अशोक चव्हाण यांची फडणवीसांवर जोरदार टीका

दर्यापूर (अमरावती) : मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे,  तर ‘फसवणीस’ म्हणून ओळखले जातात. राज्यातील व देशातील जनतेने त्यांचा हा गोरखधंदा उद्ध्वस्त करीत काँग्रेसला सत्तेत आणावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले. स्थानिक तरुण उत्साही मंडळाच्या मैदानात आयोजित जनसंघर्ष यात्रेदरम्यान जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. 

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाने उद्ध्वस्त झालेल्या व्यापारी व शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे काहीच नाही. भिकारी झालेले भाजप सरकार सर्वसामान्यांना काहीच देऊ शकत नाही. देशात मुली व महिला असुरक्षित असून ‘भाजप भगाओ-बेटी बचाओ’ असा नारा त्यांनी दिला. राज्यातील ८९ हजार शेतकऱ्यांना ३८ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. परंतु, एक वर्ष पूर्ण होऊनही कर्जमाफी देण्यात आली नाही. याआधी काँग्रेसने शेतकऱ्यांकडून कोणताही अर्ज भरून न घेता एका निर्णयाने सरसकट कर्जमाफी दिली होती. तत्पूर्वी, मान्यवरांची मूर्तिजापूर ते उत्साही मंडळाच्या मैदानापर्यंत संविधान बचाव दिंडी काढण्यात आली. यासह युवक काँग्रेसच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅलीसुद्धा काढण्यात आली. दर्यापूर काँग्रेस कमिटीच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

हे शासन केवळ सहा महिन्यांचे- पृथ्वीराज चव्हाण भाजपाच्या कार्यकाळात कुठलाही विकास होऊ शकला नाही. त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे हे शासन केवळ सहा महिन्यांचे असून, त्यानंतर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काही दिवस थांबा, त्यांना जनताच धडा शिकवेल, असेही चव्हाण म्हणाले.

दर्यापूर मतदारसंघात दीड आमदारदर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा कारभार एका नव्हे, दीड आमदारांच्या भरवशावर चालतो. यामध्ये अकोट मतदारसंघाच्या आमदारांचा पूर्ण आणि दर्यापूर मतदारसंघाच्या आमदारांचा अर्धा वाटा आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोडले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी