शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:06 IST

लातूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महायुतीला फटकारलं. 

लातूर - महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा आरएसएसचं नियंत्रण आहे. एकनाथ शिंदे हा फक्त मुखवटा आहे. २ समाजात भांडण लावायचे. फूट पाडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची रणनीती तीच भाजपाची आहे. जरांगे आमचाच कार्यकर्ता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितल्याचा गौप्यस्फोट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर निशाणा साधला. 

मराठवाडा विभागातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई, ओबीसी, धनगरांच्या आरक्षणाची लढाई असेल. मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभा होतो. एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. महाराष्ट्रात जे काही चाललंय ते बरोबर चाललं नाही असं मी त्यांना सांगितले. त्यावेळी तो आमचाच कार्यकर्ता आहे, जरांगेंना मुख्यमंत्री त्यांचा कार्यकर्ताच सांगत होते. त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. ज्या काही भावना घेऊन जरांगे पाटील लढतायेत. मराठा समाज त्यांच्या पाठिशी आहेत हे पाहतोय. एकट्या जरांगे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा नाही तर संपूर्ण समाजाचा करेक्ट कार्यक्रम करायचा असा त्याचा अर्थ होतो असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री ओबीसींकडे जातात, अर्धे मंत्री मराठा समाजाकडे जातात. मग विरोधी पक्ष काहीच बोलत नाही असं बोलतात. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्हाला काहीही अडचण नाही. कुणाच्या तोंडचा घास हिसकावून देऊ नका एवढीच आमची भूमिका आहे हे आम्ही बैठकीत सांगितले. सरकारनेही तीच भूमिका ठेवली. तुम्हीच गुलाल उडवला, काय झालं, कशासाठी गुलाल उडवला हे विरोधी पक्षाला सांगितले नाही. महाराष्ट्र विकायचा गुजरातधार्जिणा करायचा हे सगळी पापे सुरू आहेत. २०१४ मध्ये आम्ही आरक्षण देतो असं तुम्हीच आश्वासन दिले, राज्यात, देशात तुमचं सरकार आहे मग आरक्षण देण्यापासून तुम्हाला थांबवले कुणी, मुद्दामून नौटंकी करायची. २ समाजात भांडण ठेवायचं. फूट पाडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची रणनीती होती तीच भाजपाची आहे. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. हे सरकार चुकून सत्तेत आलेत त्यांना परतीचा प्रवास दाखवावा लागेल असा इशाराही नाना पटोले यांनी सरकारला दिला. 

दरम्यान, हे सरकार २७० कोटी रुपये जाहिरातीत खर्च करतायेत. काँग्रेस सरकार राज्यात आल्यास महालक्ष्मी योजना आणू आणि लाडकी बहीण योजनेपेक्षा जास्त पैसे देऊ. मध्य प्रदेशात या लोकांनी योजना आणली आणि निवडणूक झाल्यावर बंद करून टाकली. आम्हाला नकली करायचं नाही. महागाई कशी कमी करता येईल त्याचे नियोजन आम्ही करू. वर्षाला ३ सिलेंडर मोफत देऊ असं हे सरकार बोलतं, पण कर्नाटकात आमचं सरकार ५०० रुपयांना सिलेंडर देतंय. २०१४ पासून २०२४ पर्यंत मोदींनी इतक्या घोषणा केल्या, त्या घोषणा तुम्हालाही आठवत नाही आणि आम्हालाही आठवत नाही. १५ लाख खात्यात टाकू, २ कोटी वर्षाला रोजगार देऊ असं बोलले होते. फडणवीस सांगतात, लोकांची स्मरणशक्ती कमी आहे असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर घणाघात केला.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४