शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:03 IST

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.

चिखली (बुलडाणा) : राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीचा मुकाबला शेतकऱ्यांनी हिमतीने करावा. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.भाजपा सेनेचे सध्याचे राजकारण म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून वाटून खाऊ असे झाले असून ते केवळ जनतेला दखाविण्यासाठी भांडतात. मात्र सत्तेचा मलीदा चाटून खातात, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. खा. चव्हाण म्हणाले की, विदर्भातील संघर्ष यात्रेच्या समारोप सभेला मिळालेल्या प्रतिसादातून सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा रोष दिसून येत आहे. तोच मतपेटीच्या माध्यमातून भाजप-सेना सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. महाआघाडी करून मतविभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले.संधीसाधुंना कायमचा आराम देण्याची वेळराम मंदीराचा प्रश्न भाजपा सेनेने सोडविला नाही. निवडणुका आल्यावरच यांना राम आठवतो. आता तर भाजपा सोबत सेनेचे उद्धव ठाकरे सुध्दा अयोध्येला जावून नौटंकी करून आले. पण संधीसांधुना आता कायमचा आराम देण्याची वेळ आल्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विधवा महिला शेतकरी संगीता मोरे यांनी सरकार विरोधात लढा उभा करण्यासाठी विखे पाटील यांना रूमने भेट देऊन सरकारचा समाचार घेण्याची विनंती केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाFarmerशेतकरी