शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:03 IST

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.

चिखली (बुलडाणा) : राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीचा मुकाबला शेतकऱ्यांनी हिमतीने करावा. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.भाजपा सेनेचे सध्याचे राजकारण म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून वाटून खाऊ असे झाले असून ते केवळ जनतेला दखाविण्यासाठी भांडतात. मात्र सत्तेचा मलीदा चाटून खातात, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. खा. चव्हाण म्हणाले की, विदर्भातील संघर्ष यात्रेच्या समारोप सभेला मिळालेल्या प्रतिसादातून सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा रोष दिसून येत आहे. तोच मतपेटीच्या माध्यमातून भाजप-सेना सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. महाआघाडी करून मतविभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले.संधीसाधुंना कायमचा आराम देण्याची वेळराम मंदीराचा प्रश्न भाजपा सेनेने सोडविला नाही. निवडणुका आल्यावरच यांना राम आठवतो. आता तर भाजपा सोबत सेनेचे उद्धव ठाकरे सुध्दा अयोध्येला जावून नौटंकी करून आले. पण संधीसांधुना आता कायमचा आराम देण्याची वेळ आल्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विधवा महिला शेतकरी संगीता मोरे यांनी सरकार विरोधात लढा उभा करण्यासाठी विखे पाटील यांना रूमने भेट देऊन सरकारचा समाचार घेण्याची विनंती केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाFarmerशेतकरी