शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काँग्रेसचा एल्गार : ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:28 IST

येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली. 

पुणे :सरकारच्या धोरणांमधून निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली. 

         पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, चारुलता टोकस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. 

          ते म्हणाले की, भाजपने आत्तापर्यंत फक्त घोषणा केल्या असून फक्त मोजक्या ऊद्योगपतींचा विकास केला आहे. त्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून विविध माध्यमातून काँग्रेस त्याचा निषेध करत आहे. आमची ही भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ३१ तारखेला सुरु होणारी ही यात्रा ७ आणि ८ सप्टेंबरला पुण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी त्यांनी देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे म्हटले.डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लँकेशा यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

अशोक चव्हाण म्हणाले की, 

  • सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. 
  • देशात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. 
  • माध्यमांची गळचेपी सुरु आहे. 
  • १५ हजार अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 
  • रोजगाराची स्थिती गंभीर असून बेरोजगारी कायम आहे. दीड कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 
  • देशातील चार न्यायाधीशांनी लोकशाही धोक्यात आल्याचे जाहीर केले.

       

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणkolhapurकोल्हापूर