शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची : सदाभाऊ खोत यांचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 17:10 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळाले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधयेकाचे गुढी उभारुन स्वागत

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र काही ऐतखाऊ बांडगुळे याला विरोध करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी विरोध केला कारण त्यांची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची आहे. असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.    तालुका हवेली, सोरतापवाडी गावात, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचे गुढी उभारुन स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत बैल गाडीतुन बळीराजाची मिरवणुक काढण्यात आली. त्यावेळी  माजी मंत्री खोत बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे , भानुदास शिंदे, प्रदीप कंद,  सुदर्शन चौधरी, प्रदीप कंद, आदी उपस्थित होते.    माजी मंत्री खोत म्हणाले की, कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाल्याने इडापीडा टळून बळीचे राज्य येणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून स्व. शेतकरी नेते शरद जोशी करीत होते. या मागणीला यश आले आहे. कसायांच्या हातात शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. शेतकऱ्यांना आता मुक्तपणे शेतमाल विकता येणार आहे.  शेतकऱ्याला त्याचा माल मार्केट आवाराच्या बाहेर विकण्याचा अधिकार मिळाला आहे. विदेशी गुंतवणूक होणार आहे.  मार्केट कमिट्या बंद  होणार नाहीत. तसेच मार्केट कमिटीमध्येच शेतमाल विकण्यासाठी जावे लागत होते. आता मात्र शेतकऱ्यांना मालाची मार्केट आवाराच्या बाहेर विक्री करता येणार आहे. पूर्वी शेतमाल साठवण्यासाठी बंदी होती त्यावर कारवाई होत असे. त्यामुळे व्यापाऱ्याचा फायदा होत होता. आता यात बदल होऊन शेतमालाला चढा भाव मिळेल. 

 पुढे खोत म्हणाले की , गावागावात शेतकऱ्यांचा समूह गट स्थापन होईल. त्यामुळे प्रभावी व्यवस्था निर्माण होईल. कॉर्पोरेट कंपन्या शेत मालासाठी करार करतील. त्यामुळे मालाची किंमत पेरणी आधीच शेतकऱ्यांना समजेल. करारात काही झाले तरी कंपनीला शेतकऱ्यांच्या जमिनी घेता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवायला कोणी येत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे. अनेकदा राजकीय नेत्याला मंत्री पद नको पण पुण्याचे किंवा मुबंईचे मार्केट कमिटी द्या अशी मागणी काहीजण करत असतात. अन काही दिवसांत सोन्याकडे हातात घालून फिरतात. फक्त लुटायचा धंदा सुरू आहे. 

............राजू शेट्टी म्हणजे चाकरगडी  या विधेयकाला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे असे विचारले असता, शेट्टी नेमके शेतकऱ्यांचे नेते आहेत की दलालांचे हे त्यांनी तपासून बघितले पाहिजे. ते  काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी करत आहेत. त्यामुळे चाकरी करणाऱ्या गड्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. अशा त्यांनी शब्दांत शेट्टी यांना उत्तर दिले.

शरद पवारांचा विरोध असेल तर स्वागतच  माजी कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांचा जर या विधेयकाला विरोध असेल तर स्वागत करायला हवे. एका सदनात विरोध करायचा आणि दुसऱ्या सदनात अनुउपस्थित राहून समर्थन करायचे. त्यांचे नेतृत्व मुळातच बिनभरवशाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी बळीराजासाठी शेतात सोन्याचा नांगर फिरवला होता.  मार्केट कमिट्यांना स्पर्धा करावी लागणार यात एक कोणतीही कार्पोरेट कंपनी येणार नाही तर अनेक कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करतील. यामुळे स्पर्धा वाढणार आहे. करार शेतीमुळे मालाचा भाव वाढेल.  यामुळे आत्महत्या थांबतील. एकदा शेतीत मध्ये मोठ्या प्रमाणार गुंतवणूक आली तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील.

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस