शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:35 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम : अनेक जण पक्षांतराच्या तयारीत; भाजप-शिवसेनेला आले ‘अच्छे दिन’!

- वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात गत विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला निवडणूकीपूर्वीच खिंडार पडू लागल्याने आघाडीच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेने या परिस्थितीचा पुरेपूर लाभ भाजप उठवित असून, अनेकजण काँग्रेस आघाडीला सोडण्याचा निर्णय घेत आहेत.

सहकार चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रावर सतत वर्चस्व ठेवून असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मोठा धक्का दिला. भाजपने ५८ पैकी एकवीस जागा जिंकल्या होत्या. पुणे जिल्ह्यातच या पक्षाला तेरा जागा मिळाल्या होत्या. त्यात पुणे शहराचा सिंहाचा वाटा होता. (आठपैकी आठ जागा जिंकल्या.) मात्र, सातारा या एकमेव जिल्ह्यातून भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. सोलापूर आणि कोल्हापुरातून प्रत्येकी दोन, तर सांगलीतून चार जागा मिळाल्या. शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यातून सहा जागांसह एकूण तेरा जागा पश्चिम महाराष्ट्रात जिंकल्या. या दोन्ही पक्षांच्या युतीकडे ३४ आमदार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण भाजपच्या वळचणीला जात आहेत. दररोज एका नेत्याचा प्रवेश चालू आहे. भाजप प्रत्येक मतदारसंघातून एका सक्षम उमेदवाराची चाचणी करीत आहे. शिवसेना पुन्हा सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहे. पुणे वगळता इतर चार जिल्ह्यांत भाजपकडे विद्यमान आमदार आठच आहेत. या चार जिल्ह्यांत स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपला ४५ उमेदवार लागणार आहेत. हीच अवस्था शिवसेनेची आहे. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. शिवाय त्यांच्याकडे अनेकांनी आघाडी सोडली तरी सक्षम उमेदवार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात केवळ आठ मतदारसंघांत काँग्रेस आघाडीकडे सक्षम उमेदवार नाहीत. याउलट भाजप-शिवसेनेवर लढण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेकांचा प्रवेश चालू आहे. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले, श्यामल बागल, आदींनी पक्ष सोडला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा आहे.

काँग्रेसमधून माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार दिलीप माने, सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले आदींनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसची अवस्था आणखीन केविलवाणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गत निवडणुकीत स्वतंत्र लढवूनही सर्व जिल्ह्यात यश मिळविले आणि सोळा जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ सातच जागा मिळाल्या. त्यात पुण्यात एकच जागा मिळाली. (भोरचे संग्राम थोपटे, सांगली जिल्ह्यात डॉ. पतंगराव कदम यांचा एकमेव विजय होता.) कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.

भाजप-शिवसेनेची युती झाली न झाली तरी संधीची वाट पाहत अनेकजण पक्षांतर करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत संघर्षातून, तसेच आघाडी झाल्यास संधी मिळणार नाही, अशी गणिते घालून अनेकजण पक्षांतर करीत आहेत. याउलट भाजपची गरजही मोठी आहे. स्वतंत्र लढायचे झाले तर भाजपकडे पुणे जिल्हा वगळता इतर चारही जिल्ह्यांतील सर्व जागा लढविण्यासाठी स्वपक्षाचे उमेदवारही नाहीत. घाऊक पद्धतीने उमेदवार आयातीचा कार्यक्रम चालू आहे.गणपतराव घेणार निवृत्ती!सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या १९६२ मधील पहिल्या निवडणुकीपासून लढत देणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख ऊर्फ आबा पुढील सभागृहात असणार नाहीत. त्यांनी वृद्धापकाळामुळे आता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.१९६२ ते २०१४ पर्यंतच्या सर्व एका पोटनिवडणुकीसह तेरा निवडणुका लढविल्या. त्यापैकी १९७२ ला ते पराभूत झाले. मात्र, एका वर्षातच आमदारांचे निधन झाले आणि पोटनिवडणुकीत देशमुख निवडून आले. १९९५ मध्ये त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला. या एकमेव सभागृहात ते नव्हते. अन्यथा, गेल्या बारा सभागृहांचे ते सदस्य होते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा