शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 15:19 IST

Congress Nana Patole News: सांगलीच्या जागेवरून केवळ कार्यकर्ते नाही, तर मीही नाराज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.

Congress Nana Patole News: महाविकास आघाडीत काम करताना सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. मात्र, तिथे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा काही बेसच नाही. तरीही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिथे काम करावे लागेल. सांगलीत विश्वजित कदम यांच्यापासून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचक भाष्य केले.

महाविकास आघाडीसोबतच राहायचे आहे. सांगलीच्या जागेबाबत केवळ कार्यकर्त्यांचा नाही, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झालेला आहे. मात्र, आघाडीत असताना चर्चा झाल्यावर आपल्याला गोष्टी निभावून न्यायच्या असतात. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहू, असे नाना पटोले यांनी नमूद केले. तसेच ठाकरे गटाने सांगलीच्या जागेबाबत फेरविचार केल्यास चांगले आहे. मोदी सरकारला हटवण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शक्य असेल तर निर्णय घेता येऊ शकेल, असा आशावाद नाना पटोलेंनी व्यक्त केला. 

काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे

विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ठाकरे गटाचा काही बदलाचा निर्णय झाला, तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे. परंतु, ठाकरे गटाने ती जागा लढवायचीच असे ठरवले आहे. अशावेळेस त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांना जे चांगले वाटत आहे, ते करतील, असे आम्हाला वाटते. ठाकरे गटाने बदलाचा निर्णय घेतला नाही आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली, तर विशाल पाटील यांना आम्ही समजवू आणि माघार घ्यायला सांगू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अर्ज भरला पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. भाजपाला हरवायचे असेल तर इथे सक्षम उमेदवार द्यायला हवा होता असे म्हणत कार्यकर्त्यांनी आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी असे म्हटले. ३८ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीत अर्ज भरले आहेत, असे विशाल पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेvishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगली