शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

“देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:45 IST

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार कारण...; नाना पटोलेंची टीका

Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून एकमागून एक सभा घेतल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहे. संजय राऊतांनी अजित पवार गटावर केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेसकडून भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला आहे. दिल्ली-द्वारका महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. देशातील अनेक महामार्गांची कामे झाले असून, त्याच किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल? त्यामुळे सतत काँग्रेसवर टीका केली जाते. पण, जेवढी टीका करतील, तेवढा फायदा काँग्रेसला होणार आहे. देशात काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे लोकांना कळले आहे, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. 

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार. शरद पवार सांगतात की, ईडीमुळे हे लोक सरकारबरोबर गेले आहेत. हे बोलले नाहीतर, ईडी आपल्यावर कारवाई करेल. म्हणून भाजपने लिहून दिल्यानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बोलावे लागते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता. मुंबई विभागीय अध्यक्षांबरोबर माझी चर्चा झाली नाही. काँग्रेसमधून लोक बाहेर जातात, ही भाजपकडून अफवा पसरवली जाते. असे काहीही होणार नाही, असा दावा नाना पटोलेंनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचे असेल तर त्यांना लिहून दिले जाते. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचे असेल, लिहायचे असेल तर तेही त्यांना लिहून दिले जाते, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवार