शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

“फडणवीसांनी फसवणूक केली, मनोज जरांगेंना दिलेला त्रास मराठा समाजाला आवडला नाही”: विशाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 17:34 IST

Congress MP Vishal Patil News: सांगलीचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

Congress MP Vishal Patil News: लोकसभा निवडणुकीतनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले असून, काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही. ओबीसीतूनच आरक्षण घेणार, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत. यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. 

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केले. या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले. सांगलीमध्ये जैन समाज, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांनी फसवणूक केली

या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला, ते मराठा समाजाला आवडलेले नाही. ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. सांगलीतील प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण