शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

“फडणवीसांनी फसवणूक केली, मनोज जरांगेंना दिलेला त्रास मराठा समाजाला आवडला नाही”: विशाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 17:34 IST

Congress MP Vishal Patil News: सांगलीचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

Congress MP Vishal Patil News: लोकसभा निवडणुकीतनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले असून, काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही. ओबीसीतूनच आरक्षण घेणार, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत. यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. 

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केले. या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले. सांगलीमध्ये जैन समाज, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांनी फसवणूक केली

या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला, ते मराठा समाजाला आवडलेले नाही. ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. सांगलीतील प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण