शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:01 IST

उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असं विधान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

Maharashtra Assembly Elections : काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नावे जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानांमुळे मविआच्या नेत्यांमध्ये खदखद सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र उद्धव ठाकरेंनीही मविआने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल असं म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

रविवारी अमरावतीमध्ये महाविकास युवा आघाडीच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलं. माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटलं होतं.आधी सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्‍पष्‍टीकरण दिले होत. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी  पुढच्या काळात त्यांनीच मुख्यमंत्रीपद ठिकाणी विराजमान व्हावं, असं म्हटलं आहे.

"प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले गांव-आपला बूथ सक्षमपणे सांभाळावा. विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये. देश विघातकी शक्तीच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली आहे. विरोधक विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखों खर्च करून मोठं-मोठे होर्डिंग लावून सरकारचे गोडवे गात असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मित्र पक्षांकडून उधळल्या जात असलेला हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा आहे. याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सर्व भेद विसरून एकजुटीने काम करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.

"जो ५० कोटी घेऊन स्वतःच्या  बापाच्या पाठीत खंजीर खुपसतो तो जनतेचा काय होणार. आताच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं. उद्धव ठाकरेंनी का नाही मुख्यमंत्री व्हायला हवं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. ते तुम्हाला सहन नाही झालं तर काय होणार. माझ्या मनातली इच्छा सांगते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या ठिकाणी विराजमान व्हावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत," असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेYashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेस