शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेद हरवलेली काँग्रेस विजयापासून ‘वंचित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:46 IST

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन खासदार होते. २०१९ साली तेही उरले नाहीत.

- अतुल कुलकर्णी२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन खासदार होते. २०१९ साली तेही उरले नाहीत. चंद्रपूरची जी एकमेव जागा मिळाली ती देखील शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्यामुळे! शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले पण त्यांचेही तिकीट काँग्रेस नेत्यांनी राजकीय कुरघोडीत कापले होते. नंतर ते दिले आणि त्यामुळे काँग्रेसला सांगण्यासाठी एक खासदार तरी महाराष्ट्रात उरला. या अपयशाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील या दोघांचेच आहे.साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते पद भूषविणाऱ्या विखे यांनी कधीच भाजप-शिवसेना सरकारला अडचणीत आणले नाही. तुम्ही असे का वागता असा जाब प्रदेशाध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण किंवा श्रेष्ठींनी विखेंना विचारला नाही. बेरोजगारी, नोटबंदी, दुष्काळ असे अनेक विषय असतानाही राज्य ढवळून काढण्याचे काम या नेत्यांनी केले नाही. राज्यातल्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण काँग्रेसने कधी हा विषय लावून धरला नाही. उलट विरोधी पक्षाचे काम सत्तेत राहून शिवसेनेने केले आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यात सगळा वेळ घालवला.पाच वर्षात कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्याचे कामही कधी या नेत्यांनी केले नाही. काँग्रेस राज्यात अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा एवढा निरुस्ताह पक्षात होता. लोकसभा निवडणुकांसाठी बूथ बांधणी, कार्यकर्त्यांची जोडणी, नेत्यांना जबाबदारीचे वाटप करणे अशी मुलभूत कामेही झाली नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेत वापर करुन घेतला नाही. माध्यमे त्यांच्या बोलण्याची दखल घेतात हे माहिती असूनही त्यांना कधी मुंबईत बोलू दिले नाही. त्यांना कधी पुण्याला तर कधी औरंगाबादला जा, असे सांगितले जायचे. आपल्यापेक्षा अन्य कोणीही मोठा होऊ नये हेच ध्येय ठेवून निवडणुकीला सामोरे गेले की जे व्हायचे तेच येथे झाले.जागा वाटपात जो घोळ घातला गेला त्याला तोड नव्हती. औरंगाबादची जागा राष्टÑवादीने मागूनही ती दिली नाही, पुण्याच्या जागेबद्दलही शेवटपर्यंत घोळ घातला गेला. राहुल गांधी यांची मुंबईत एकही सभा झाली नाही आणि अशोक चव्हाण नांदेडच्या बाहेर पडले नाहीत.>संपूर्ण अपयशकाँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यापैकी १५ ठिकाणी त्यांची भाजपासोबत तर १० ठिकाणी शिवसेनेसोबत लढत होती. त्यातील सेनेसोबतची एक जागा जिंकता आली.राहुल गांधी यांनी नागपूर, चंद्रपूर, नांदेड, संगमनेर या चार ठिकाणी जाहीर सभा घेतल्या तर पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबईकडे त्यांनी पाठ फिरवली.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा नांदेडमध्ये व्हावी असे अशोक चव्हाण यांना वाटले, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व राज यांनी सभा घेतली, यातच सगळे काही आले.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९chandrapur-pcचंद्रपूर