शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:32 IST

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा मी त्याला पाठिंबा देईन असं विधान उद्धव ठाकरे यांनी मविआच्या मेळाव्यात केले. मात्र ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे. आधी निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतात ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे ठरवता येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या मागणीवर दिली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री झालं तर पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु असं कधी होत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि आम्ही आमचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री इथं ठरत नसतो तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असं वातावरण तयार झालं. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल असं त्यांनी सांगितले. चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते. 

तसेच उद्धव ठाकरेंची असं काही आग्रहाची मागणी नाही. ते दिल्लीला गेले आणि आमच्या श्रेष्ठींशी बोलून आलेत. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल. जागावाटपावर चर्चा होईल. वेगवेगळे फॉर्म्युले समोर येतायेत. दिवाळी संपल्यावर लगेच महाराष्ट्रातील निवडणूक लागेल. निवडणुका कधीही झाल्या तरी सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळे निवडणूका पुढे गेल्या तर बरं होईल. निवडणुकीपूर्वी काही योजना जाहीर केल्यात. त्याचा एखादा हफ्ता जास्त गेला तर त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत असावे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा काही आक्षेप नाही. निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आम्ही काही राजकीय आरोप करणार नाही. निवडणूक आयोगाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे ते स्वीकारले पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

धार्मिक धुव्रीकरण करून यश मिळेल असं वाटणं गैरसमज 

राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू न देता शांतता प्रस्थापित केली पाहिजे. कुणी चुकीचे विधान केले तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. भयमुक्त वातावरणाचं राजकारण आणि निवडणूक झाली पाहिजे. धार्मिक धुव्रीकरण आणि धार्मिक तेढ निर्माण करूनच आपल्याला यश येईल असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. लोकांनी निर्णय आर्थिक कारणांसाठी घेतला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांनी निर्णय घेतला. ज्या ८० आमदारांनी गद्दारी केली ते जेव्हा त्यांच्या मतदारसंघात परत जातील तेव्हा निवडणूक कितीही लांबवली तरी त्याचा फायदा होणार नाही असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ताधारी भाजपा महायुतीवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४