शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:32 IST

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा मी त्याला पाठिंबा देईन असं विधान उद्धव ठाकरे यांनी मविआच्या मेळाव्यात केले. मात्र ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे. आधी निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतात ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे ठरवता येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या मागणीवर दिली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री झालं तर पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु असं कधी होत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि आम्ही आमचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री इथं ठरत नसतो तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असं वातावरण तयार झालं. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल असं त्यांनी सांगितले. चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते. 

तसेच उद्धव ठाकरेंची असं काही आग्रहाची मागणी नाही. ते दिल्लीला गेले आणि आमच्या श्रेष्ठींशी बोलून आलेत. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल. जागावाटपावर चर्चा होईल. वेगवेगळे फॉर्म्युले समोर येतायेत. दिवाळी संपल्यावर लगेच महाराष्ट्रातील निवडणूक लागेल. निवडणुका कधीही झाल्या तरी सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळे निवडणूका पुढे गेल्या तर बरं होईल. निवडणुकीपूर्वी काही योजना जाहीर केल्यात. त्याचा एखादा हफ्ता जास्त गेला तर त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत असावे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा काही आक्षेप नाही. निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आम्ही काही राजकीय आरोप करणार नाही. निवडणूक आयोगाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे ते स्वीकारले पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

धार्मिक धुव्रीकरण करून यश मिळेल असं वाटणं गैरसमज 

राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू न देता शांतता प्रस्थापित केली पाहिजे. कुणी चुकीचे विधान केले तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. भयमुक्त वातावरणाचं राजकारण आणि निवडणूक झाली पाहिजे. धार्मिक धुव्रीकरण आणि धार्मिक तेढ निर्माण करूनच आपल्याला यश येईल असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. लोकांनी निर्णय आर्थिक कारणांसाठी घेतला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांनी निर्णय घेतला. ज्या ८० आमदारांनी गद्दारी केली ते जेव्हा त्यांच्या मतदारसंघात परत जातील तेव्हा निवडणूक कितीही लांबवली तरी त्याचा फायदा होणार नाही असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ताधारी भाजपा महायुतीवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४