शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

गिरीश महाजन फार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही; नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 18:52 IST

बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपकडून या विधानावर सडकून टीका केली जात असताना नाना पटोले हेदेखील जशास तसा पलटवार करताना दिसत आहेत. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा गिरीश महाजन यांच्यावर पलटवारभारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केलीय - नाना पटोलेभाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच

भंडारा : बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपकडून या विधानावर सडकून टीका केली जात असताना नाना पटोले हेदेखील जशास तसा पलटवार करताना दिसत आहेत. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे. (congress leader nana patole criticised bjp leader girish mahajan)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. भारतमातेच्या नावावर भाजप मोठा झाला आहे. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.

ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय; नितेश राणेंचा खोचक सवाल

इंधनदरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

इंधन दरवाढ, शेकऱ्यांचे प्रश्न यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे चित्रपटाचे प्रदर्शनही होऊ देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले होते.

दरम्यान, नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. हिंदी मराठी चित्रपटसृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाcongressकाँग्रेस