शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 02:50 IST

शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले.

मुंबई :  किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना समान निधीचे वाटप होते की नाही हे पाहा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती नंतर प्रभारी पाटील यांनी दिली.राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा झाली. गरज पडली आणि रुग्णांची संख्या वाढू लागली तर, मुख्यमंत्री जे कोणते निर्णय घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असा विश्वासही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. राष्ट्रवादीने मात्र लॉकडाऊनविषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शनिवारच्या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली.पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली होती त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी केली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाण