शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

कॉँग्रेस-भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू -ओवेसी

By admin | Published: April 01, 2015 2:29 AM

कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना

मुंबई : कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना भडकविण्याचे राजकारण करीत आहेत. गेल्या १० महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरे काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने जनता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी खेरवाडीत केले. वांद्रे (पू़) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार सिराज खान यांच्यासाठी आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. खेतवाडीमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे प्रचार कार्यालय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. ओवेसी म्हणाले, की आपण भारतीय राज्यघटना मानत असून त्याने दिलेल्या अधिकारानुसार समाजातील अल्पसंख्याक व बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करीत आहोत. मात्र जातीयवादी शक्ती व कॉँग्रेसकडून आपल्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविला जात आहे. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर आरएसएस व हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी घटनेविरोधात व भडकाऊ विधाने केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज असताना सरकारकडून त्यांना अभय देऊन समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. या वेळी उमेदवार सिराज खान यांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)