शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावरून काँग्रेसचा हल्लाबोल!

By admin | Updated: December 1, 2014 02:06 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही.

औरंगाबाद : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपुरात ८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दुष्काळ परिषदेत दिली.राज्यभरात १ व २ डिसेंबरला तालुका पातळीवर काँगे्रसचे कार्यकर्ते निदर्शने करतील, तर ४ डिसेंबरला जिल्हा पातळीवर रास्ता रोको केला जाईल. यंदा मान्सूनमध्ये अपुरा पाऊस तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीकच आले नाही. कापसाचेही उत्पादन अत्यल्प आहे. त्यालाही योग्य भाव मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पाण्याचा दुष्काळ जाणवत नसल्याचे औरंगाबादमध्ये म्हणाले. शिवाय सरकार म्हणे उपग्रहाच्या माध्यमातून माहिती घेत आहे. मग प्रशासन कशासाठी आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. काँग्रेस सरकारने तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले होते. शेतकरी होरपळून निघालेला असताना केंद्र सरकारचे पाहणी पथक सुद्धा अद्याप आलेले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)