शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 18:22 IST

ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात असताना ऐनवेळी जागावाटपावरून ही युती होऊ शकली नव्हती. मात्र लोकसभेत वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील युती न होण्याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बारामती व नांदेड हे दोन मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांना हवे होते, मात्र ह्या जागा देण्यासा काँग्रेस-राष्ट्रवादी तयार न झाल्याने अखेर ही युती फिसकटली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केला आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीवेळी महाआघाडीत प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी सामील होणार असल्याचे बोलले जात होते. सुरवातीला प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला हे मान्य नव्हते. तरीही दोन्हीकडून प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी प्रकाश आंबडेकर यांनी आपली 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनतर आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर झाली असल्याने युतीसाठी ती माघे घेता येणार नसल्याचे सांगितले होते. पण तरीही आमचा प्रस्ताव मान्य असेल तर काँग्रेसने आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी.अर्ज द्यावा असेही आंबेडकर म्हणाले होते. मात्र पुढे काँग्रेसकडून कोणतेही प्रतिकिया आली नसल्याने आंबेडकर यांनी आपले उरलेले उमेदवार जाहीर केले होते.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर आणि काँग्रेस यांच्यात युती न होण्याचे मुख्य कारण बारामती आणि नांदेडचा मतदारसंघ असल्याचे आता समोर आले आहे. अण्णाराव पाटील यांनी याचा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी या दोन्ही ठिकाणची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. त्यामुळे ह्या जागा तुंम्हाला सोडता येणार नसल्याची भूमिका आंबडेकर यांनी घेतली होती. मात्र हे काँग्रेस-राष्ट्रवादिला मान्य नव्हते. त्यामुळेच पुढे युती होऊ शकली नसल्याचे अण्णाराव पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार यांना उमेदवारी देणार आहेत. मात्र ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. त्यामुळे लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीची जागा आघाडी आणि वंचितमधील युती न होण्याचे कारण ठरू शकते अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळत आहे.