शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 18:22 IST

ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात असताना ऐनवेळी जागावाटपावरून ही युती होऊ शकली नव्हती. मात्र लोकसभेत वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील युती न होण्याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बारामती व नांदेड हे दोन मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांना हवे होते, मात्र ह्या जागा देण्यासा काँग्रेस-राष्ट्रवादी तयार न झाल्याने अखेर ही युती फिसकटली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केला आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीवेळी महाआघाडीत प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी सामील होणार असल्याचे बोलले जात होते. सुरवातीला प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला हे मान्य नव्हते. तरीही दोन्हीकडून प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी प्रकाश आंबडेकर यांनी आपली 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनतर आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर झाली असल्याने युतीसाठी ती माघे घेता येणार नसल्याचे सांगितले होते. पण तरीही आमचा प्रस्ताव मान्य असेल तर काँग्रेसने आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी.अर्ज द्यावा असेही आंबेडकर म्हणाले होते. मात्र पुढे काँग्रेसकडून कोणतेही प्रतिकिया आली नसल्याने आंबेडकर यांनी आपले उरलेले उमेदवार जाहीर केले होते.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर आणि काँग्रेस यांच्यात युती न होण्याचे मुख्य कारण बारामती आणि नांदेडचा मतदारसंघ असल्याचे आता समोर आले आहे. अण्णाराव पाटील यांनी याचा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी या दोन्ही ठिकाणची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. त्यामुळे ह्या जागा तुंम्हाला सोडता येणार नसल्याची भूमिका आंबडेकर यांनी घेतली होती. मात्र हे काँग्रेस-राष्ट्रवादिला मान्य नव्हते. त्यामुळेच पुढे युती होऊ शकली नसल्याचे अण्णाराव पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार यांना उमेदवारी देणार आहेत. मात्र ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. त्यामुळे लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीची जागा आघाडी आणि वंचितमधील युती न होण्याचे कारण ठरू शकते अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळत आहे.