शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 18:22 IST

ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात असताना ऐनवेळी जागावाटपावरून ही युती होऊ शकली नव्हती. मात्र लोकसभेत वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील युती न होण्याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बारामती व नांदेड हे दोन मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांना हवे होते, मात्र ह्या जागा देण्यासा काँग्रेस-राष्ट्रवादी तयार न झाल्याने अखेर ही युती फिसकटली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केला आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीवेळी महाआघाडीत प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी सामील होणार असल्याचे बोलले जात होते. सुरवातीला प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला हे मान्य नव्हते. तरीही दोन्हीकडून प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी प्रकाश आंबडेकर यांनी आपली 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनतर आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर झाली असल्याने युतीसाठी ती माघे घेता येणार नसल्याचे सांगितले होते. पण तरीही आमचा प्रस्ताव मान्य असेल तर काँग्रेसने आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी.अर्ज द्यावा असेही आंबेडकर म्हणाले होते. मात्र पुढे काँग्रेसकडून कोणतेही प्रतिकिया आली नसल्याने आंबेडकर यांनी आपले उरलेले उमेदवार जाहीर केले होते.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर आणि काँग्रेस यांच्यात युती न होण्याचे मुख्य कारण बारामती आणि नांदेडचा मतदारसंघ असल्याचे आता समोर आले आहे. अण्णाराव पाटील यांनी याचा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी या दोन्ही ठिकाणची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. त्यामुळे ह्या जागा तुंम्हाला सोडता येणार नसल्याची भूमिका आंबडेकर यांनी घेतली होती. मात्र हे काँग्रेस-राष्ट्रवादिला मान्य नव्हते. त्यामुळेच पुढे युती होऊ शकली नसल्याचे अण्णाराव पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार यांना उमेदवारी देणार आहेत. मात्र ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. त्यामुळे लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीची जागा आघाडी आणि वंचितमधील युती न होण्याचे कारण ठरू शकते अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळत आहे.