शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:56 PM

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ले होत असताना माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.

सातारा येथे बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनने १९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४५ हजार चौरस कि.मी. भारतीय भूभाग बळकावला आहे. दरम्यान, पीएमओने २० जून रोजी स्पष्ट केले होते की, गत ६० वर्षांत देशाने ४३ हजार चौरस कि.मी. भाग गमावला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात एक इंचही जमीन गमावली नाही. शरद पवार हे जाहीरपणे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांना सांगत आहेत की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि याचे राजकारण करू नका. त्यांनी हे स्पष्ट केले की, चीनने आपला ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. शरद पवार यांचे असेही म्हणणे आहे की, गलवान खोऱ्यातील घटना ही संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे, अशा स्वरूपात लगेच पाहता येणार नाही. कारण, गस्तीवरील भारतीय सैनिक सतर्क होेते.चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी?चीनच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची शरद पवार यांची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले. सरकारने विरोधी पक्षांची समोरासमोर बैठक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या मुद्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर असहमती दर्शविली होती. चीनच्या मुद्यावर काँग्रेस काही प्रमाणात एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण, कोणताही प्रमुख विरोधी पक्ष त्यांना समर्थन करताना दिसत नाही. अगदी डावे पक्ष, डीएमके, जेएमएम, ममता बॅनर्जी, सपा, बसपा, टीडीपी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बेजेडी हे पक्षही थेट बोलत नाहीत. कारण, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchinaचीनcongressकाँग्रेस